Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

“कोई हाथ भी न मिलाएगा जो गले मिलोगे तपाक से…” उर्दू गझलविश्वातील तेजस्वी आवाज हरपला; शायर बशीर बद्र यांचे निधन

mosami kewat by mosami kewat
May 28, 2026
in बातमी, मनोरंजन, सामाजिक
0
"कोई हाथ भी न मिलाएगा जो गले मिलोगे तपाक से…" उर्दू गझलविश्वातील तेजस्वी आवाज हरपला; शायर बशीर बद्र यांचे निधन

"कोई हाथ भी न मिलाएगा जो गले मिलोगे तपाक से…" उर्दू गझलविश्वातील तेजस्वी आवाज हरपला; शायर बशीर बद्र यांचे निधन

       

Bashir Badr Passes Away : आधुनिक उर्दू गझलला नवी ओळख देणारे ज्येष्ठ शायर डॉ. बशीर बद्र यांचे आज दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने उर्दू साहित्यविश्वावर शोककळा पसरली असून देशभरातील साहित्यप्रेमी, शायर आणि चाहत्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे.

दीर्घकाळापासून त्यांची प्रकृती सातत्याने खालावत असल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली होती. त्यांच्या अंत्यसंस्काराची वेळ अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली तरी आज संध्याकाळी अंत्यसंस्कार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Bashir Badr Passes Away)

Also Read : दीक्षाभूमीवर हिंदुत्ववादी भगवाध्वज; युवक काँग्रेसकडून छेडछाड, भाजपसारख काँग्रेसही बौद्धांचा द्वेष करते ?

बशीर बद्र यांनी आपल्या साध्या, संवेदनशील आणि मनाला भिडणाऱ्या शायरीमुळे उर्दू गझलला सामान्य माणसांच्या भावविश्वाशी जोडले. प्रेम, विरह, आयुष्याचे चढ-उतार आणि मानवी नात्यांतील सूक्ष्म भावना त्यांनी आपल्या शेरांमधून अत्यंत प्रभावीपणे मांडल्या. त्यामुळेच त्यांची गझल केवळ मुशायऱ्यांपुरती मर्यादित राहिली नाही, तर ती लोकांच्या दैनंदिन बोलण्यातही स्थान मिळवू शकली.

1969 मध्ये त्यांनी अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून उर्दूमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 12 ऑगस्ट 1974 रोजी मेरठ कॉलेजच्या उर्दू विभागात व्याख्याता म्हणून त्यांनी अध्यापनाची सुरुवात केली. 1990 पर्यंत त्यांनी तेथे सेवा बजावली. अध्यापनासोबतच त्यांनी शायरीच्या क्षेत्रातही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. (Bashir Badr Passes Away)

Also Read : NEET पेपर फुटीप्रकरणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्यव्यापी धरणे आंदोलन 

विशेषतः 1974 ते 1990 हा काळ त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीचा सुवर्णकाळ मानला जातो. या काळात त्यांच्या गझलांनी देशभरात लोकप्रियता मिळवली आणि ते आधुनिक उर्दू गझलचे एक महत्त्वाचे नाव बनले. “कोई हाथ भी न मिलाएगा जो गले मिलोगे तपाक से…” आणि “उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो…” यांसारख्या त्यांच्या अनेक गझला आजही रसिकांच्या मनात जिवंत आहेत.


       
Tags: Bashir BadrBashir Badr Passes AwayBhopalGhazalLegendary ShayarMadhya PradeshshayarUrdu Poetry
Previous Post

म्युन्सिपल फायनान्सचे ‘वित्तीयकरण’: नागरी विकासाचा नवा जुगार?

Next Post

मुंबईत ‘जलसा वंचित बहुजनांचा – २०२६’चे आयोजन; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार गौरव

Next Post
मुंबईत ‘जलसा वंचित बहुजनांचा - २०२६’चे आयोजन; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार गौरव

मुंबईत ‘जलसा वंचित बहुजनांचा - २०२६’चे आयोजन; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार गौरव

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण अपडेट : पुढील सुनावणीत न्यायालय ठरवणार नियमावली; ॲड. प्रकाश आंबेडकरांची माहिती
बातमी

सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण अपडेट : पुढील सुनावणीत न्यायालय ठरवणार नियमावली; ॲड. प्रकाश आंबेडकरांची माहिती

by mosami kewat
July 28, 2026
0

औरंगाबाद : शहीद सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातील सुनावणी आज न्यायालयात पार पडली. या प्रकरणात पुढील सुनावणीदरम्यान न्यायालय स्वतः नियमावली (गाईडलाईन्स) तयार...

Read moreDetails
पॅरा-ॲथलेटिक्समध्ये भारताचा ऐतिहासिक डंका: शर्मिला धनखडची सुवर्ण कामगिरी, शिल्पा शायलाने जिंकले कांस्य

पॅरा-ॲथलेटिक्समध्ये भारताचा ऐतिहासिक डंका: शर्मिला धनखडची सुवर्ण कामगिरी, शिल्पा शायलाने जिंकले कांस्य

July 28, 2026
औरंगाबादमध्ये दूषित पाणीपुरवठ्याविरोधात वंचित बहुजन आघाडीचे जनआक्रोश आंदोलन; समस्या न सुटल्यास पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा

औरंगाबादमध्ये दूषित पाणीपुरवठ्याविरोधात वंचित बहुजन आघाडीचे जनआक्रोश आंदोलन; समस्या न सुटल्यास पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा

July 28, 2026
केवळ डिग्र्या पुरेशा नाहीत: विचारवंत नेतृत्वाची गरज

केवळ डिग्र्या पुरेशा नाहीत: विचारवंत नेतृत्वाची गरज

July 28, 2026
कॉमनवेल्थ गेम्स २०२६: वेटलिफ्टर ज्ञानेश्वरी यादवची दमदार कामगिरी, भारताला मिळवून दिले रौप्यपदक!

कॉमनवेल्थ गेम्स २०२६: वेटलिफ्टर ज्ञानेश्वरी यादवची दमदार कामगिरी, भारताला मिळवून दिले रौप्यपदक!

July 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home