अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात असलेल्या पारस गावात नुकत्याच झालेल्या ढगफुटीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी पारस गावाला भेट देऊन नुकसानग्रस्त नागरिकांची विचारपूस केली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी नागरिकांनी तक्रार केली की, प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी झालेल्या नुकसानीची योग्य माहिती घेतली नाही. केवळ घरमालकांचे आणि मोबाईल नंबर लिहून घेण्यात आले, असे नुकसानग्रस्तांनी सांगितले. नागरिकांच्या या तक्रारी ऐकून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी तालुका पदाधिकारी आणि तालुका महिला आघाडी अध्यक्षांना बाळापूर उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन देण्याच्या सूचना दिल्या.
या भेटीदरम्यान जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्यासोबत जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष आम्रपालीताई खंडारे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष अनुराधाताई डांगे, गजानन गवई, जायदाबी ताई, गजाननभाऊ दांदळे (जि.प. सदस्य), पद्माकर तायडे (मा. ता. अध्यक्ष भारिप), भास्कर सिरसाट (सर्कल अध्यक्ष), शेख शारिक भाई (मा. ता. कोषाध्यक्ष), शेख रईस भाई, हमिद भाई (मा. प.स. सदस्य), विनित भारसाकडे (सर्कल उपाध्यक्ष), प्रदीप तायडे (युवक महासचिव), शेख जमिल, नितेश तायडे, बाबुराव इंगळे, पारस सर्कल पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
कोण आहेत वंचित बहुजन आघाडीने नवे प्रदेशाध्यक्ष?
मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी राजेंद्र निरंजन पातोडे यांची निवड झाल्यानंतर राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. परंतु महाराष्ट्रभर त्यांच्या...
Read moreDetails






