Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अनवली गावातील पूरग्रस्तांची सुजात आंबेडकर यांनी घेतली भेट; तहसीलदारांना तातडीच्या मदतीसाठी फोन!

mosami kewat by mosami kewat
September 28, 2025
in बातमी
0
अनवली गावातील पूरग्रस्तांची सुजात आंबेडकर यांनी घेतली भेट; तहसीलदारांना तातडीच्या मदतीसाठी फोन!
       

सोलापूर : पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक गावांमध्ये शेती आणि घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील अनवली गावातही पावसाच्या पाण्याने मोठा हाहाकार माजवला असून शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी अनवली गावाला भेट देऊन पूरग्रस्तांची स्थिती जाणून घेतली.

सुजात आंबेडकर यांनी पीडित शेतकरी व नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. शेतजमिनीतील पिके, जनावरांच्या चाऱ्याचे झालेले नुकसान, घरांची पडझड, दैनंदिन जगण्यावरील आलेले संकट यांची त्यांनी माहिती घेतली. या परिस्थितीवर गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणी करत त्यांनी तहसीलदारांशी फोनवरून संवाद साधला व तातडीने मदत पोहोचवून योग्य नुकसान भरपाई देण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी सुजात आंबेडकर म्हणाले, “पूरग्रस्त शेतकरी व गावकऱ्यांच्या मदतीसाठी प्रशासनाने तत्काळ पुढाकार घ्यावा. केवळ पंचनामे करून न थांबता शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने मदतीचा हात द्यावा. वंचित बहुजन आघाडी पीडित जनतेच्या पाठीशी ठामपणे उभी राहील.”

या दौऱ्यात वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ते प्रशांत बोराडे, सोलापूर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, तसेच पंढरपूर तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


       
Tags: AgricultureCrop DamageFarmerMaharashtraMonsoonrainRainfallsolapurSujat AmbedkarVanchit Bahujan Aaghadivbafotindia
Previous Post

Amravati : रस्त्याचे काम रखडले; खासदार-आमदार गाढ झोपेत..!

Next Post

एमआयएम, भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश; भिवंडीच्या राजकारणात नवे समीकरण!

Next Post
एमआयएम, भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश; भिवंडीच्या राजकारणात नवे समीकरण!

एमआयएम, भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश; भिवंडीच्या राजकारणात नवे समीकरण!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
कोण आहेत वंचित बहुजन आघाडीने नवे प्रदेशाध्यक्ष?
बातमी

कोण आहेत वंचित बहुजन आघाडीने नवे प्रदेशाध्यक्ष?

by mosami kewat
August 5, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी राजेंद्र निरंजन पातोडे यांची निवड झाल्यानंतर राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. परंतु महाराष्ट्रभर त्यांच्या...

Read moreDetails
नवी मुंबईत आरपीआय (आ) गटाला मोठे खिंडार; दिघाचे कार्याध्यक्ष अनिल अंगरख यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश 

नवी मुंबईत आरपीआय (आ) गटाला मोठे खिंडार; दिघाचे कार्याध्यक्ष अनिल अंगरख यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश 

August 5, 2026
शेयर मार्केटमधील , विशेषतः तरुण, गुंतवणूकदारांसाठी “कोरियन” धडे !  

शेयर मार्केटमधील , विशेषतः तरुण, गुंतवणूकदारांसाठी “कोरियन” धडे !  

August 5, 2026
नाशिकमध्ये खड्ड्यांच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचे तिरडी आंदोलन; रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणी

नाशिकमध्ये खड्ड्यांच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचे तिरडी आंदोलन; रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणी

August 5, 2026
लोकशाही पद्धतीने वंचित बहुजन आघाडीची प्रदेश कार्यकारिणी निवड; राजेंद्र पातोडे प्रदेशाध्यक्ष

लोकशाही पद्धतीने वंचित बहुजन आघाडीची प्रदेश कार्यकारिणी निवड; राजेंद्र पातोडे प्रदेशाध्यक्ष

August 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home