Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

इस्राईल – पॅलेस्टाईन मध्ये ‘शांतीसेना’ पाठवण्याचा ठराव संसदेत मंजूर व्हावा – ॲड. प्रकाश आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
December 8, 2023
in बातमी
0
इस्राईल – पॅलेस्टाईन मध्ये ‘शांतीसेना’ पाठवण्याचा ठराव संसदेत मंजूर व्हावा – ॲड. प्रकाश आंबेडकर
       

मुंबई(८ डिसेंबर) : मुंबईमधील आझाद मैदानावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इस्राईल – पॅलेस्टाईन मध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या वाढीमुळे होत असलेल्या परिणामांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आणि तेथील परिस्थिती पूर्वपदावर यावी. यासाठी भारताने प्रयत्न करावेत यासाठी शांती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या शांती सभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले. देशातील जेवढे धर्मनिरपेक्ष पक्ष आहेत, त्यांचे जेवढे संसदेतील खासदार आहेत त्यांनी संसदेत इस्राईल – पॅलेस्टाईन या दोन्ही देशात शांतीसेना पाठवण्याचा ठराव मंजूर करुन घ्यायला हवा. अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची एक नवीन प्रतिमा तयार होत आहे. एक आर्थिक ताकद म्हणून भारत पुढे येत आहे आणि याच आर्थिक ताकदीच्या जोरावर भारत अन्य देशांवर प्रभाव टाकू शकतो. त्यामध्ये इस्राईल देखील येते. पण सरकार दोन बाजूने बोलत आहे. प्रधानमंत्री इस्राईलच्या बाजूने बोलले आणि २४ तासानंतर कॅबिनेट सचिवाने म्हटले की, भारत सरकारची भूमिका आणि कॅबिनेट चा निर्णय असा आहे की आम्ही पॅलेस्टिनी जनतेसोबत आहोत.असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 मी इथल्या सरकारला सांगू इच्छितो की, कोण कोणासोबत आहे किंवा कोणासोबत नाही हे बघण्यापेक्षा हे लक्षात घ्यावं की, इथला प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्र आहे, हा भारत स्वतंत्र भारत आहे. राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी इस्राईल आणि पॅलेस्टाईन संघर्षाबाबत ठाम भूमिका घ्यायला हवी असे त्यांनी यावेळी म्हटले.

 यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांना देखील सुनावले आहे. ते म्हणाले की,काँग्रेस आणि सपा स्वतःला धर्मनिरपेक्ष पक्ष समजतात. संसदेच्या अधिवेशनात इस्राईल – पॅलेस्टाईन मध्ये शांती राहण्यासाठी आणि यांच्या संघर्षावर उपाय काढण्यात यावा याचा ठराव संमत करण्यासाठी भारत सरकारकडून प्रयत्न व्हावा.

काँग्रेस आणि समाजवादी पार्टी चे लोक संसदेत आहेत. त्यांना मी आग्रह करतो की इस्राईल – पॅलेस्टाईन संदर्भात तुम्ही संसदेत चर्चा करावी.असेही त्यांनी म्हटले आहे.

इस्राईल – पॅलेस्टाईन संघर्ष वाढला तर मध्य आशियातील ८० लाख भारतीयांना भारतात सुरक्षित आणावं लागेल. यात भारताची तिजोरी रिकामी होईल. ही फक्त मुस्लिमांची समस्या नाही आहे तर संपूर्ण जगाची समस्या आहे. असे म्हणत ॲड. आंबेडकरांनी महत्वाच्या प्रश्नावर लक्ष वेधले आहे.

देशातील कोणताही पक्ष इस्राईल आणि पॅलेस्टाईन प्रश्नावर बोलायला तयार नाही आणि कोणत्याही प्रकारची भूमिका घेत नाही. केंद्र सरकार देखील यावर उदासीन दिसत आहे. अशा वेळी भारताच्या परराष्ट्र धोरणावर याचा परिणाम होऊ शकतो याचा विचार कोणताही पक्ष करताना दिसत नाही. मात्र वंचित बहुजन आघाडी या पक्षाने आणि ॲड. प्रकाश आंबेडकरांनी या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेत आज आझाद मैदानावर शांती सभा घेत इतर पक्षांना देखील ठाम भूमिका घेण्याचे आणि पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.


       
Tags: centralgovernmentCongressisraelMaharashtrapalestinePrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

गाझा पट्टीतील वाढत्या हिंसाचाराच्या विरोधात सर्वधर्मीय प्रतिनिधींचा ठराव !

Next Post

मुंबईत होणाऱ्या शांती सभेला सर्वधर्मीय धर्मगुरुंची उपस्थिती !

Next Post
मुंबईत होणाऱ्या शांती सभेला सर्वधर्मीय धर्मगुरुंची उपस्थिती !

मुंबईत होणाऱ्या शांती सभेला सर्वधर्मीय धर्मगुरुंची उपस्थिती !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
प्रामाणिकपणाबद्दल व्यापारी मोहम्मद अखीम मोहम्मद जय्युम यांचा समाजरत्न अनिल कांबळे यांच्या हस्ते सत्कार
बातमी

प्रामाणिकपणाबद्दल व्यापारी मोहम्मद अखीम मोहम्मद जय्युम यांचा समाजरत्न अनिल कांबळे यांच्या हस्ते सत्कार

by mosami kewat
August 18, 2026
0

२४ तोळ्यांचे चांदीचे कडे परत करून जपली माणुसकी; प्रामाणिकपणाचा आदर्श समाजासमोर हिंगोली : समाजात स्वार्थ, फसवणूक आणि गैरप्रकारांचा सुळसुळाट होत...

Read moreDetails
‘मी राजगृहातील रमाई बोलतेय’ हा केवळ प्रयोग नव्हे तर वैचारिक प्रबोधन : प्रा. दिलिप महालिंगे

‘मी राजगृहातील रमाई बोलतेय’ हा केवळ प्रयोग नव्हे तर वैचारिक प्रबोधन : प्रा. दिलिप महालिंगे

August 18, 2026
राष्ट्रीय सुरक्षेची फजिती: अपयश, हितसंबंध आणि दुहेरी मापदंड

राष्ट्रीय सुरक्षेची फजिती: अपयश, हितसंबंध आणि दुहेरी मापदंड

August 18, 2026
नवी मुंबईत SIR प्रक्रियेसंदर्भात व्हीबीए (VBA) पदाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांशी चर्चा

नवी मुंबईत SIR प्रक्रियेसंदर्भात व्हीबीए (VBA) पदाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांशी चर्चा

August 18, 2026
साईनगर, रबाळे परिसरात नागरी सुविधांचा बोजवारा; वंचित बहुजन आघाडीकडून महापालिका प्रशासनाला जाब

प्रत्येक अडचणीत वंचित बहुजन आघाडी नागरिकांच्या मदतीला; साईनगर रबाळेतील समस्यांवर प्रशासनाला इशारा

August 18, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home