Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अपुऱ्या सुविधा आणि दुरवस्थेविरोधात वरळीत वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जी दक्षिण मनपा कार्यालयावर तिरडी मोर्चा

mosami kewat by mosami kewat
August 16, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
अपुऱ्या सुविधा आणि दुरवस्थेविरोधात वरळीत वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जी दक्षिण मनपा कार्यालयावर तिरडी मोर्चा
       

मुंबई : वरळी येथील माता रमाई आंबेडकर स्मशानभूमीतील अपुऱ्या व बंद सुविधांसह विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडी – वरळी विधानसभा यांच्या वतीने जी दक्षिण मनपा विभागाच्या कार्यालयावर तिरडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा गुरुवार, २० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजता जी दक्षिण विभाग मनपा कार्यालय, नामजोशी मार्ग येथे काढण्यात येणार आहे.

वरळी येथील माता रमाई आंबेडकर स्मशानभूमी ही मुंबईतील जुनी आणि ऐतिहासिक स्मशानभूमी असून, पूर्वी येथे एकाच वेळी १० ते १२ मृतदेहांवर लाकडावर अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था होती. त्यामुळे नागरिकांना अंत्यविधीच्या वेळी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत नव्हता. मात्र, स्मशानभूमीचे विकासकाम करून आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पारेख ट्रस्ट आणि जी दक्षिण विभाग, मुंबई महानगरपालिका यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. तरीही सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.

अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असलेल्या अनेक यंत्रणा बंद किंवा अपुऱ्या असून धुराचे प्रदूषण, योग्य वायुवीजनाचा अभाव, ऑक्सिजन व हवा खेळती राहण्याच्या व्यवस्थेतील त्रुटी यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील प्रकाशव्यवस्था अपुरी असून अंतर्गत रस्त्यांचीही दुरवस्था झाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

याशिवाय गार्डनच्या नावाखाली दफनभूमीतील उपलब्ध जागा कमी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. कामगार आणि सुरक्षा रक्षकांची पुरेशी व्यवस्था नसल्याने तसेच परिसरात गर्दुल्ले, अंमली पदार्थांचे सेवन करणारे आणि मद्यपान करणाऱ्या समाजकंटकांचा वावर वाढल्याने सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला असल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.

कोट्यवधी रुपये खर्च करूनही नागरिकांना सन्मानजनक, सुरक्षित आणि आरोग्यदायी अंत्यसंस्काराची सुविधा मिळत नसेल, तर या संपूर्ण विकासकामाची चौकशी करून दोषी अधिकारी व संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

“मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी सन्मानजनक व्यवस्था करा” या प्रमुख मागणीसह जी दक्षिण मनपा विभागाच्या कथित भोंगळ कारभाराविरोधात हा तिरडी मोर्चा काढण्यात येणार आहे. प्रशासनाने स्मशानभूमीतील सर्व समस्या तातडीने सोडवून नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.


       
Tags: MaharashtraPoliticalVaraliVBA Worli Tiradi Morcha
Previous Post

अंजलीताई आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन नियोजनाची बैठक

Next Post

घाटकोपर दरड दुर्घटनेची स्नेहल सोहनी यांच्याकडून पाहणी; पीडित कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन

Next Post
घाटकोपर दरड दुर्घटनेची स्नेहल सोहनी यांच्याकडून पाहणी; पीडित कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन

घाटकोपर दरड दुर्घटनेची स्नेहल सोहनी यांच्याकडून पाहणी; पीडित कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
महिलांच्या आत्मनिर्भरतेचा महासोहळा! प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते ‘तेजस्वी आत्मनिर्भर महाबाजार’चे भव्य उद्घाटन
बातमी

महिलांच्या आत्मनिर्भरतेचा महासोहळा! प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते ‘तेजस्वी आत्मनिर्भर महाबाजार’चे भव्य उद्घाटन

by mosami kewat
September 5, 2026
0

अकोला : पर्यावरण संवर्धनासोबतच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या अकोला महोत्सवाला शुक्रवारी उत्साहात सुरुवात झाली. या महोत्सवांतर्गत तापडिया नगर येथील...

Read moreDetails
ग्रामपंचायत आरक्षणाच्या नियमांवर वंचित बहुजन आघाडीचा आक्षेप; नियम ७ आणि शून्य लोकसंख्येवरील आरक्षण रद्द करण्याची मागणी

ग्रामपंचायत आरक्षणाच्या नियमांवर वंचित बहुजन आघाडीचा आक्षेप; नियम ७ आणि शून्य लोकसंख्येवरील आरक्षण रद्द करण्याची मागणी

September 5, 2026
‘जय भीम Gen Z!’: वंचित बहुजन आघाडीचा नवा उपक्रम

‘जय भीम Gen Z!’: वंचित बहुजन आघाडीचा नवा उपक्रम

September 5, 2026
वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांमुळे शिरडशहापूरच्या जिल्हा परिषद शाळेला मिळाले ६ शिक्षक

वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांमुळे शिरडशहापूरच्या जिल्हा परिषद शाळेला मिळाले ६ शिक्षक

September 5, 2026
समता सैनिक दलाच्या फलकाची विटंबना; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

समता सैनिक दलाच्या फलकाची विटंबना; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

September 5, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home