पुणे : सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या वतीने राष्ट्रीय परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींविरोधात शुक्रवारी विद्यार्थी आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. हा मोर्चा दुपारी 3 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे काढण्यात येणार आहे.
या आंदोलनाच्या माध्यमातून दोन प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ पदाचा राजीनामा द्यावा, तसेच राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) रद्द करून तिच्याकडील सर्व परीक्षा घेण्याची जबाबदारी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे (UPSC) सोपवावी, अशी आग्रही मागणी आहे. (Student Aakrosh Morcha Pune)
Also Read : शहीद मुरली नाईक प्रकरणाची अंतिम सुनावणी ७ जुलै रोजी – ॲड. प्रकाश आंबेडकर
अलीकडील काळात विविध राष्ट्रीय प्रवेश आणि भरती परीक्षांमध्ये झालेल्या गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढला असून, त्याविरोधात हा मोर्चा काढण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. (Student Aakrosh Morcha Pune)
या आंदोलनात सम्यक विद्यार्थी आंदोलनासोबत वंचित बहुजन आघाडी, युवा आघाडी आणि महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार असून, विद्यार्थी पालकांनीही मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






