Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Election commission : निवडणूक घोटाळ्यांविरुद्ध लढाईसाठी काँग्रेसला पत्र; पण अद्याप उत्तर नाही!

mosami kewat by mosami kewat
August 14, 2025
in बातमी
0
Election commission :  निवडणूक घोटाळ्यांविरुद्ध लढाईसाठी काँग्रेसला पत्र; पण अद्याप उत्तर नाही!
       

ॲड. प्रकाश आंबेडकर यांची माहिती

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना १० ऑगस्ट रोजी पत्र लिहून निवडणूक घोटाळ्यांविरुद्ध एकत्रित लढाईत पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. मात्र, अद्याप त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

अ‍ॅड. आंबेडकर यांनी एक्सवर म्हटले आहे की, १० ऑगस्ट २०२५ रोजी काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांना निवडणूक घोटाळ्यांविरुद्ध एकत्र येण्याचे आमंत्रण देणारे पत्र लिहिले होते. आज १४ ऑगस्ट आहे, परंतु अद्यापपर्यंत कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

त्यांनी पुढे म्हटले आहे की, यापूर्वी १६ जानेवारी २०२५ रोजी त्यांनी २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील घोटाळ्यांविरुद्ध सहकार्यासाठी खरगे यांना पत्र लिहिले होते, परंतु काँग्रेसने या लढाईत उच्च न्यायालयात वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिला नाही. जर राहुल गांधी आणि काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या या कायदेशीर लढाईत सहभागी झाले असते, तर निवडणूक आयोगाचे “गुपित” आधीच उघड झाले असते आणि भविष्यात हेराफेरीची शक्यता कमी झाली असती.

सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाविरुद्ध लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रकरणात राहुल गांधी अजूनही हस्तक्षेप करू शकतात, असेही आंबेडकर यांनी सुचवले आहे.

‎अ‍ॅड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, “आमच्यात कोणताही अहंकार नाही, कारण देशाची लोकशाही, संविधान आणि देश धोक्यात आहे.”

‎अ‍ॅड. आंबेडकर यांनी पाठवलेल्या पत्राला कॉंग्रेस आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.


       
Tags: CongessElection commissionPoliticalPrakash Ambedkarvbaforindiavote
Previous Post

संगमनेरमधील पल्लवी गंगावणे प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाईची वंचित बहुजन आघाडीची मागणी

Next Post

शिरपूरमधील नागरिकांच्या समस्यांसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Next Post
शिरपूरमधील नागरिकांच्या समस्यांसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

शिरपूरमधील नागरिकांच्या समस्यांसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
हिंदुत्ववाद्यांचे षडयंत्र ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक उद्ध्वस्त करते – ॲड. प्रकाश आंबेडकर 
बातमी

हिंदुत्ववाद्यांचे षडयंत्र ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक उद्ध्वस्त करते – ॲड. प्रकाश आंबेडकर 

by mosami kewat
April 23, 2026
0

राज्यभरात वंचित बहुजन आघाडी 'शिवाजी कोण होता'? पुस्तकाचे वाचन करणार पुणे : कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेले 'शिवाजी कोण होता?'...

Read moreDetails
नवउदारमतवादाचा अस्त आणि फॅसिझमचा उदय: एका फसलेल्या जागतिकीकरणाचे विश्लेषण

नवउदारमतवादाचा अस्त आणि फॅसिझमचा उदय: एका फसलेल्या जागतिकीकरणाचे विश्लेषण

April 23, 2026
एकनाथ शिंदे यांच्या आमदाराचा बालिशपणा ; ‘शिवाजी कोण होता?’  या पुस्तकाच्या प्रकाशकाला धमकावले !

एकनाथ शिंदे यांच्या आमदाराचा बालिशपणा ; ‘शिवाजी कोण होता?’  या पुस्तकाच्या प्रकाशकाला धमकावले !

April 23, 2026
भारताच्या अपमानावर मोदी गप्प का? ॲड. प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधान मोदींवर संताप !

भारताच्या अपमानावर मोदी गप्प का? ॲड. प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधान मोदींवर संताप !

April 23, 2026
पुस्तकांशी नाते सांगणारे राजगृह 

पुस्तकांशी नाते सांगणारे राजगृह 

April 23, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home