Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग १३९ मध्ये ॲड. प्रकाश आंबेडकरांचे शक्तिप्रदर्शन

mosami kewat by mosami kewat
January 6, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग १३९ मध्ये ॲड. प्रकाश आंबेडकरांचे शक्तिप्रदर्शन
       

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १३९ मध्ये वंचित बहुजन आघाडी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार स्नेहल अरुण सोहनी यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. ही जाहीर सभा लुंबिणी बाग, गोवंडी येथे पार पडली. सभेला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख मार्गदर्शक ॲड. प्रकाश आंबेडकर उपस्थित होते.

सभेत बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर टीका केली. २०१४ पासून देशात सत्तेत असलेल्या सरकारने विकास व भ्रष्टाचारमुक्तीचे आश्वासन दिले होते; मात्र सत्तेत आल्यानंतर विकासाचा कार्यक्रम आणि भ्रष्टाचारविरोधी भूमिका बाजूला पडल्याचा आरोप त्यांनी केला. “धार्मिक राजकारण आणि समाजात ध्रुवीकरण वाढवण्याचे काम सुरू झाले,” असेही त्यांनी नमूद केले.

महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, या विचारांचा वारसदार मानवतावाद घेऊन चालतो. “समाजपरिवर्तनासाठी चळवळ चालवणारी माणसे हवी आहेत आणि त्यासाठी प्रथम स्वतःमध्ये बदल आवश्यक आहे. सत्ता ही विचारांवर चालते; मात्र सध्याचे केंद्र व राज्याचे धोरण संविधान बदलणारे आणि धार्मिक ध्रुवीकरण करणारे आहे,” असे ते म्हणाले.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत बोलताना ॲड. आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यास मुंबईतील प्रत्येक वस्तीला सकाळी १० वाजेच्या आत स्वच्छ पाणी पुरवण्याचे आश्वासन दिले. “ही निवडणूक केवळ उमेदवारांची किंवा पक्षाची नसून, मुंबईतील प्रत्येक नागरिकाची आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून दिल्यास मुंबई महानगरपालिकेचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही,” असे त्यांनी सांगितले.

मुंबईतील या जाहीर सभेत मोठा जनसागर उसळला होता. मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मुंबई महानगरपालिका निवडणुकीला चुरस लागली असून वंचित बहुजन आघाडी सध्या आघाडी घेताना दिसून येत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या सभांना नागरिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असून वंचित बहुजन आघाडी ह्या निवडणुकीत जोरदार बाजी मारण्याची शक्यता स्थानिकांकडून व्यक्त केले जात आहे.


       
Tags: BjoBjp rssBMC municipal corporation election newsConstitutionElectionElection campaignElection commissionMaharashtraMumbai developmentpoliticsPrakash Ambedkar
Previous Post

‘वंचित’चा वाढता जनाधार पाहून विरोधकांचे धाबे दणाणले; सुजात आंबेडकरांचे पोस्टर फाडून प्रचार रिक्षेवर भ्याड हल्ला!

Next Post

औरंगाबादमध्ये वंचितचा धडाकेबाज प्रचार! प्रा. अंजली आंबेडकर दिवसभरात घेणार ६ जाहीर सभा

Next Post
औरंगाबादमध्ये वंचितचा धडाकेबाज प्रचार! प्रा. अंजली आंबेडकर दिवसभरात घेणार ६ जाहीर सभा

औरंगाबादमध्ये वंचितचा धडाकेबाज प्रचार! प्रा. अंजली आंबेडकर दिवसभरात घेणार ६ जाहीर सभा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मुंबईतील नागरी समस्यांबाबत वंचित बहुजन आघाडीचे शिष्टमंडळ आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट
Uncategorized

मुंबईतील नागरी समस्यांबाबत वंचित बहुजन आघाडीचे शिष्टमंडळ आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट

by mosami kewat
June 20, 2026
0

मुंबई: वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई प्रदेशच्या वतीने शुक्रवारी (दि.१९) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त (प्रशासन) अश्विनी भिडे यांची भेट घेऊन मुंबईतील विविध...

Read moreDetails
NEET परीक्षा लिक प्रकरण : सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचा तीव्र आक्रोश

NEET परीक्षा लिक प्रकरण : सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचा तीव्र आक्रोश

June 20, 2026
परीक्षा व्यवस्थे विरोधात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून तीव्र निषेध ; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

परीक्षा व्यवस्थे विरोधात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून तीव्र निषेध ; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

June 19, 2026
16 चेंडूंत अर्धशतक, 34 चेंडूंत शतक; बिहारच्या अक्षरा गुप्ताचे वादळी त्रिशतक, 126 चेंडूंत 306 धावांची ऐतिहासिक खेळी

16 चेंडूंत अर्धशतक, 34 चेंडूंत शतक; बिहारच्या अक्षरा गुप्ताचे वादळी त्रिशतक, 126 चेंडूंत 306 धावांची ऐतिहासिक खेळी

June 19, 2026
चीन १३०० दशलक्ष बॅरल्स वि भारत २० दशलक्ष बॅरल्स!

चीन १३०० दशलक्ष बॅरल्स वि भारत २० दशलक्ष बॅरल्स!

June 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home