Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‘वंचित’चा वाढता जनाधार पाहून विरोधकांचे धाबे दणाणले; सुजात आंबेडकरांचे पोस्टर फाडून प्रचार रिक्षेवर भ्याड हल्ला!

mosami kewat by mosami kewat
January 6, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
‘वंचित’चा वाढता जनाधार पाहून विरोधकांचे धाबे दणाणले; सुजात आंबेडकरांचे पोस्टर फाडून प्रचार रिक्षेवर भ्याड हल्ला!
       

औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. याचेच चित्र काही इतर पक्षातील कार्यकर्त्यांना ते पाहणे कठीण जात आहे.

औरंगाबाद येथे प्रभाग क्रमांक ५ मधील गरमपाणी परिसर येथे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार वर्षा रतन जाधव आणि श्याम भारसाकले यांच्या प्रचार रिक्षेवर काही समाजकंटकांनी हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून राजकीय वर्तुळात तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. 

वंचित बहुजन आघाडीला मिळणारा प्रचंड प्रतिसाद तसेच निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे रणधुमाळी दिसून येत आहे. मात्र, काही इतर पक्षातील कार्यकर्त्यांना टोचत असल्यामुळे हे कृत्य केल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक ५ मध्ये वंचित बहुजन आघाडीचा प्रचार सुरू असताना काही जातीवादी समाजकंटकांनी प्रचार रिक्षेला अडवले. यावेळी रिक्षेवर असलेले युवा नेते सुजात आंबेडकर यांचा फोटो असलेले बॅनर फाडण्यात आले. एवढ्यावरच न थांबता, समाजकंटकांनी रिक्षा चालकाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. या हल्ल्यामुळे रिक्षेचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मिळणारा वाढता जनपाठिंबा पाहून विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.

लोकशाहीच्या मार्गाने लढा देण्याऐवजी आता विरोधक गुंडगिरीवर उतरले आहेत,” अशी टीका पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी केली आहे. अशा भ्याड हल्ल्यांनी पक्षाचा प्रचार थांबणार नाही, उलट जनताच आता मतदानातून या गुंडगिरीला उत्तर देईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे.

प्रचार रिक्षेवर झालेल्या हल्ल्याची आणि चालकाला झालेल्या मारहाणीची दखल घेत,  दोषी समाजकंटकांना त्वरित अटक करण्याची मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. निवडणुकीच्या काळात झालेल्या या हिंसक घटनेमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


       
Tags: aurangabadAurangabad municipal corporation electionConstitutionElectionElection pracharMaharashtraMunicipal corporation election newspoliticsVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

बार्शी टाकळी नगरपरिषदेवर ‘वंचित’चा झेंडा; सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत नगराध्यक्षा अख्तर खातून यांनी पदभार स्वीकारला 

Next Post

मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग १३९ मध्ये ॲड. प्रकाश आंबेडकरांचे शक्तिप्रदर्शन

Next Post
मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग १३९ मध्ये ॲड. प्रकाश आंबेडकरांचे शक्तिप्रदर्शन

मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग १३९ मध्ये ॲड. प्रकाश आंबेडकरांचे शक्तिप्रदर्शन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मुंबईतील नागरी समस्यांबाबत वंचित बहुजन आघाडीचे शिष्टमंडळ आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट
Uncategorized

मुंबईतील नागरी समस्यांबाबत वंचित बहुजन आघाडीचे शिष्टमंडळ आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट

by mosami kewat
June 20, 2026
0

मुंबई: वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई प्रदेशच्या वतीने शुक्रवारी (दि.१९) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त (प्रशासन) अश्विनी भिडे यांची भेट घेऊन मुंबईतील विविध...

Read moreDetails
NEET परीक्षा लिक प्रकरण : सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचा तीव्र आक्रोश

NEET परीक्षा लिक प्रकरण : सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचा तीव्र आक्रोश

June 20, 2026
परीक्षा व्यवस्थे विरोधात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून तीव्र निषेध ; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

परीक्षा व्यवस्थे विरोधात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून तीव्र निषेध ; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

June 19, 2026
16 चेंडूंत अर्धशतक, 34 चेंडूंत शतक; बिहारच्या अक्षरा गुप्ताचे वादळी त्रिशतक, 126 चेंडूंत 306 धावांची ऐतिहासिक खेळी

16 चेंडूंत अर्धशतक, 34 चेंडूंत शतक; बिहारच्या अक्षरा गुप्ताचे वादळी त्रिशतक, 126 चेंडूंत 306 धावांची ऐतिहासिक खेळी

June 19, 2026
चीन १३०० दशलक्ष बॅरल्स वि भारत २० दशलक्ष बॅरल्स!

चीन १३०० दशलक्ष बॅरल्स वि भारत २० दशलक्ष बॅरल्स!

June 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home