Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

निजामी मराठ्यांपासून फारकत घेतल्याशिवाय गरीब मराठ्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारणार नाही – प्रकाश आंबेडकर

mosami kewat by mosami kewat
October 28, 2025
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
निजामी मराठ्यांपासून फारकत घेतल्याशिवाय गरीब मराठ्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारणार नाही - प्रकाश आंबेडकर

निजामी मराठ्यांपासून फारकत घेतल्याशिवाय गरीब मराठ्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारणार नाही - प्रकाश आंबेडकर

       

परभणी : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) यांनी पुन्हा एकदा मोठे विधान केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, मराठा समाजाला ओबीसीत (OBC) समाविष्ट करण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या (Maharashtra Government) प्रयत्नांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दोन वेळा नकार दिला आहे आणि तो निर्णय कायम राहण्याची शक्यता आहे.

मराठा समाजातील अंतर्गत गटबाजीवर बोट ठेवत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मराठा समाजात ‘निजामी मराठा’ (Nizami Maratha) आणि ‘रयतेचा मराठा’ (Rayatecha Maratha) असे दोन गट आहेत. निजामी मराठे हे निजामाच्या बाजूने राहिलेले, तर रयतेचे मराठे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत राहिलेले आहेत.

सोळाव्या शतकापासूनचा हा संघर्ष आजही सुरू आहे. “सत्तेतील निजामी मराठ्यांमुळे रयतेला न्याय नाही” सत्तेत बसलेला वर्ग हा निजामी मराठ्यांचा असून, त्यांची रयतेतील मराठ्यांना आरक्षण देण्याची मानसिकताच नाही, असा थेट आरोप अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी केला. ते म्हणाले, “जोपर्यंत रयतेतील मराठा हा निजामी मराठ्यांपासून फारकत घेत नाही, तोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही.” रयतेतील मराठ्यांकडे तीन-चार एकर जमीन आहे, ते श्रीमंत नाहीत. त्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा या मागणीलाही निजामी मराठा वर्ग पाठिंबा देत नाही, असे त्यांनी नमूद केले.

पुण्यात SRA विरोधी वंचित बहुजन आघाडीचा विराट धडक मोर्चा’ यशस्वी; प्रशासनाकडून सर्व मागण्या मान्य!

“बदलासाठी मतदारांनी ठरवावे” –

निजामी मराठ्यांच्या हातातून सत्ता रयतेतील मराठ्यांच्या हातात जाईल, या भीतीमुळे सत्तेतील निजामी मराठे रयतेतील मराठ्यांचे प्रश्न सोडवत नाहीत, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. “निजामी मराठ्यांपासून फारकत घेतल्याशिवाय रयतेतील मराठ्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती सुधारणार नाही,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

शेवटी अ‍ॅड. आंबेडकर यांनी रयतेच्या मतदारांना आवाहन केले आहे की, “आता रयतेच्या मतदारांनी ठरवावे की, त्यांना बदल हवा आहे की नाही?”


       
Tags: MaharashtraparbhaniPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

एल आय सी आणि अदानी समूह

Next Post

संघाला धडकी भरविणारा मोर्चा आणि ‘छेडोगे तो छोडेगे नही’ चा अभूतपूर्व इशारा

Next Post
संघाला धडकी भरविणारा मोर्चा आणि ‘छेडोगे तो छोडेगे नही’ चा अभूतपूर्व इशारा

संघाला धडकी भरविणारा मोर्चा आणि ‘छेडोगे तो छोडेगे नही’ चा अभूतपूर्व इशारा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
नगरसेवक शेख बिलाल यांचे निवेदन: बजेट बैठकीपूर्वी ऑडिटचा पेच, पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
बातमी

नगरसेवक शेख बिलाल यांचे निवेदन: बजेट बैठकीपूर्वी ऑडिटचा पेच, पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

by mosami kewat
April 30, 2026
0

Budget 2026 : नांदेड महानगरपालिकेच्या होणाऱ्या अर्थसंकल्प बैठकीपूर्वी मनपाच्या आर्थिक पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सन 2022 ते 2025...

Read moreDetails
हातमजुरी करणाऱ्या मजुराची मुलगी बनली टॅक्स असिस्टंट अधिकारी ; ट्युशन न लावता एकाच वेळी केल्या तीन स्पर्धा परीक्षा पास

हातमजुरी करणाऱ्या मजुराची मुलगी बनली टॅक्स असिस्टंट अधिकारी ; ट्युशन न लावता एकाच वेळी केल्या तीन स्पर्धा परीक्षा पास

April 28, 2026
मृत बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन बँकेत पोहोचला भाऊ; १९,३०० रुपयांसाठी व्यवस्थेविरुद्ध आदिवासीचा मूक आक्रोश

मृत बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन बँकेत पोहोचला भाऊ; १९,३०० रुपयांसाठी व्यवस्थेविरुद्ध आदिवासीचा मूक आक्रोश

April 28, 2026
टाकळी प्रदे येथील घटनेच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा; आमदार मंगेश चव्हाणांची दडपशाही !

टाकळी प्रदे येथील घटनेच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा; आमदार मंगेश चव्हाणांची दडपशाही !

April 28, 2026
रयतेच्या राजाची बदनामी कराल, तर याद राखा !

रयतेच्या राजाची बदनामी कराल, तर याद राखा !

April 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home