Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोल्यात ‘संपूर्ण दारूबंदी’ करा; मेळाव्याला रात्री १२ पर्यंत परवानगी द्या – भारतीय बौद्ध महासभेची मागणी

mosami kewat by mosami kewat
September 30, 2025
in बातमी
0
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोल्यात 'संपूर्ण दारूबंदी' करा; मेळाव्याला रात्री १२ पर्यंत परवानगी द्या – भारतीय बौद्ध महासभेची मागणी

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोल्यात 'संपूर्ण दारूबंदी' करा; मेळाव्याला रात्री १२ पर्यंत परवानगी द्या – भारतीय बौद्ध महासभेची मागणी

       

अकोला : भारतीय बौद्ध महासभेच्या अकोला जिल्हा शाखेच्या वतीने दिनांक ३ ऑक्टोबर २०२५, शुक्रवार रोजी शहरात आयोजित करण्यात येत असलेल्या भव्य धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, संघटनेने जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करण्याची व धम्म मेळाव्यासाठी रात्री बारा वाजेपर्यंत वेळेत वाढ करण्याची मागणी केली आहे.

गेली ४२ वर्षांपासून हा महोत्सव अकोला येथे भव्य प्रमाणात साजरा होत असून, मिरवणूक आणि धम्म मेळाव्यामध्ये शहरी तसेच ग्रामीण भागातून लाखो अनुयायी सहभागी होतात. प्रचंड गर्दीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी, भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा शाखेने जिल्हा प्रशासनाकडे संपूर्ण दारूबंदी लागू करण्याची मागणी केली आहे.

वाहतुकीत बदल आणि वेळेत वाढ :

महोत्सवांतर्गत निघणाऱ्या भव्य मिरवणुकीच्या मार्गावर सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत रहदारी पूर्णपणे बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. यात वडगाव मार्गावरील सर्व रावर चौक ते अग्रसेन चौक या दरम्यानचा रस्ता आणि उड्डाणपुलासह जड वाहनांची वाहतूक थांबवून पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच, हा धम्म मेळावा समाजाच्या प्रबोधनासाठी अत्यंत महत्त्वाचा असून या मेळाव्याशी सामाजिक भावना जोडलेल्या असल्याने, मेळावा रात्री दोन तास वाढवून रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्याची मागणी भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा सरचिटणीस आणि जिल्हाध्यक्षांनी केली आहे.

भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून अकोला येथे हा धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा होतो, ज्यात राज्यभरातून अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. या पार्श्वभूमीवर, शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच अनुयायांच्या सोयीसाठी या मागण्या प्रशासनाने त्वरित मान्य कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे..


       
Tags: AkolaDhammachakra Pravartan Dayfestival celebrationIndian Buddhist MahasabhaMaharashtraPrakash Ambedkarrally permission
Previous Post

Nagpur : वंचित बहुजन आघाडीच्या दणक्यानंतर दीक्षाभूमीतील अपूर्ण कामांना तातडीने गती; रातोरात गिट्टी चुरीचे ट्रक पोहचले!

Next Post

Mumbai : वंचित बहुजन आघाडीचा पाटी–पेन्सिल देऊन सहाय्यक आयुक्तांना अनोखा निषेध

Next Post
Mumbai : वंचित बहुजन आघाडीचा पाटी–पेन्सिल देऊन सहाय्यक आयुक्तांना अनोखा निषेध

Mumbai : वंचित बहुजन आघाडीचा पाटी–पेन्सिल देऊन सहाय्यक आयुक्तांना अनोखा निषेध

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
माळशिरसमध्ये शेतात काम करणाऱ्या दलित महिला मजुराची गोळी झाडून हत्या ; राज्यभरात तीव्र संताप
बातमी

माळशिरसमध्ये शेतात काम करणाऱ्या दलित महिला मजुराची गोळी झाडून हत्या ; राज्यभरात तीव्र संताप

by mosami kewat
July 9, 2026
0

माळशिरस : तालुक्यातील चौंडेश्वरवाडी येथे शेतात मजुरीचे काम करणाऱ्या उषा साठे या अनुसूचित जातीतील महिला मजुराची गोळी झाडून अत्यंत क्रूरपणे...

Read moreDetails
परळी तालुक्यातील जिरेवाडी येथे राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी; विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप

परळी तालुक्यातील जिरेवाडी येथे राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी; विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप

July 9, 2026
निकृष्ट बियाणे विकणाऱ्या कंपनी व कृषी सेवा केंद्रावर कारवाई  करा – वंचित बहुजन आघाडीची मागणी

निकृष्ट बियाणे विकणाऱ्या कंपनी व कृषी सेवा केंद्रावर कारवाई  करा – वंचित बहुजन आघाडीची मागणी

July 8, 2026
पुण्यातील मोशी परिसरात भीषण दुर्घटना! मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा ढिगारा इमारतीवर कोसळला; ५ कामगारांचा जागीच मृत्यू

पुण्यातील मोशी परिसरात भीषण दुर्घटना! मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा ढिगारा इमारतीवर कोसळला; ५ कामगारांचा जागीच मृत्यू

July 8, 2026
चीनचा अरुणाचल प्रदेशातील भारतीय भूभागावर कब्जा; केंद्र सरकार गप्प का? ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींना सवाल!

चीनचा अरुणाचल प्रदेशातील भारतीय भूभागावर कब्जा; केंद्र सरकार गप्प का? ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींना सवाल!

July 8, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home