उल्हासनगर : उल्हासनगर-३ परिसरातील मशिदीसह ३१ गरिबांच्या घरांवर प्रशासनाकडून तोडक कारवाई करण्यात येणार होती. या प्रस्तावित कारवाईविरोधात वंचित बहुजन आघाडीने तीव्र भूमिका घेत प्रशासनाकडे पाठपुरावा केला.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रशासनाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून संबंधित तोडक कारवाई तात्काळ थांबविण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर मशिदीसह ३१ घरांवरील प्रस्तावित कारवाई स्थगित करण्यात आली.
या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज पवार आणि जिल्हा प्रवक्ते सोनू पवार यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून नागरिकांची बाजू प्रभावीपणे मांडली.
कारवाई स्थगित झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी मनोज पवार आणि सोनू पवार यांना भेटण्यासाठी बोलावले. यावेळी अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी व्हिडिओ कॉलद्वारे नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांनी त्यांचे तसेच वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करत समाधान व्यक्त केले.


