Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

देशात मुस्लिम द्वेषाचे वातावरण निर्माण करण्याचा भाजप-आरएसएसचा डाव !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
July 2, 2024
in राजकीय
0
देशात मुस्लिम द्वेषाचे वातावरण निर्माण करण्याचा भाजप-आरएसएसचा डाव !
       

ॲड. प्रकाश आंबेडकर : निवडणूक निकालानंतर मुस्लिमांवरील हल्ले वाढले

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे ४ जून रोजी निकाल जाहीर झाले. त्यानंतर लगेचच देशभरात मुस्लिमांवरील हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मुस्लिमांवरील हे हल्ले भाजप-आरएसएस आणि त्यांच्या जातीयवादी धर्मांध संघटनांनी आखले आहेत, हे उघड आहे.
आमच्या मुस्लिम बंधू-भगिनींवरील या नियोजनबध्द हल्ल्यांचा मी तीव्र निषेध करतो. देशात द्वेष, भीती आणि जीवघेणे वातावरण निर्माण करण्याचा भाजप आरएसएसचा प्रयत्न असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे.

आंबेडकर यांनी म्हटले आहे की, काँग्रेस गप्प का? यापैकी दोन हल्ले तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश या काँग्रेसशासित राज्यांमध्ये झाले. पण राहुल गांधी, सोनिया गांधी किंवा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या घटनांचा निषेध केला नाही किंवा त्यांना या हिंसाचारात बळी पडलेल्यांना भेटायला वेळ मिळाला नाही. आपल्या मुस्लिम बांधवांवरील हिंसाचाराकडे लक्ष देण्यास काँग्रेस का टाळाटाळ करत आहे?

…तर एवढी भीती का?
मला सांगा, काँग्रेस भाजपपेक्षा वेगळी कशी आणि भाजपा काँग्रेसपेक्षा वेगळा कसा? असा सवाल उपस्थित करत त्यांनी म्हटले की, मी तुम्हाला सर्वांना आधीच सावध केले होते आणि आता मी पुन्हा चेतावणी देत आहे. हे दोन्ही पक्ष एकच आहेत. त्यांना तुमची पर्वा नाही. त्यांना फक्त तुमची मते हवी आहेत.

हा कोणत्या प्रकारचा मजबूत विरोधी पक्ष आहे?
यांच्यासाठी मुस्लिम हा फक्त निवडणुकीत जुमल्याप्रमाणे मते मिळवण्यासाठी वापरण्याचा शब्द आहे. मुस्लिम समाज जगला काय मेला काय, यांना काहीही फरक पडत नाही. हे फक्त आपली जुनी संपत्ती, खुर्ची आणि घरे वाचविण्याची लढाई लढत आहेत, देश वाचविण्याची नव्हे असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.


       
Tags: bjpMaharashtraMuslimPrakash AmbedkarrssVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्यांची नावे जाहीर

Next Post

काँग्रेस मुस्लिमांचे नाव घ्यायलाही तयार नाही

Next Post
काँग्रेस मुस्लिमांचे नाव घ्यायलाही तयार नाही

काँग्रेस मुस्लिमांचे नाव घ्यायलाही तयार नाही

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आरक्षण : वास्तव आणि विपर्यास
पुस्तक प्रकाशन

आरक्षण : वास्तव आणि विपर्यास

by mosami kewat
September 15, 2025
0

संपादक : डॉ. ज्ञानराजा चिघळीकरपरीक्षक : अनिल वैद्य (माजी न्यायाधीश, नाशिक) भारतातील आरक्षण हा केवळ राजकीय वादाचा विषय नसून सामाजिक...

Read moreDetails
पंतप्रधान मोदी देशाचे परराष्ट्र धोरण फक्त अंबानीसाठी राबवताय - अॅड. प्रकाश आंबेडकर

पंतप्रधान मोदी देशाचे परराष्ट्र धोरण फक्त अंबानीसाठी राबवताय – अॅड. प्रकाश आंबेडकर

September 15, 2025
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची तयारी; साकोली येथे जिल्हास्तरीय बैठक संपन्न

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची तयारी; साकोली येथे जिल्हास्तरीय बैठक संपन्न

September 15, 2025
इगतपुरीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

इगतपुरीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 15, 2025
Ahmadnagar : वंचित बहुजन आघाडीच राज्यात विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे - प्रा. किसन चव्हाण

Ahmadnagar : वंचित बहुजन आघाडीच राज्यात विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे – प्रा. किसन चव्हाण

September 15, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home