नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बहुतांश मुले जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये गोरगरीब वर्गातील मुलांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र या शाळांत शिक्षकांची संख्या अगदी कमी असून जिल्ह्यात शेकडो पदे रिक्त आहेत. शिक्षकांच्या या रिक्त संख्येमुळे मुलांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात जाण्याचा मार्गावर आहे. जिल्ह्यातील शिक्षकांचे रिक्त पदे तत्काळ भरा यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय सहारे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा शिक्षणधिकारी निखिल भुयार यांना निवेदन देण्यात आले.
शिक्षकांच्या कमी संख्येमुळे खेड्यातील काही पालक मुलांना खाजगी शाळांमध्ये पाठवत असून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. जिल्हा परिषद टिकल्या तरच गरिबांना शिक्षण घेण्यात येईल. अन्यथा कॉन्व्हेंट संस्कृतीमध्ये गरिबांची मुले कुठे शिकतील अशी विचारणा यावेळी करण्यात आली.
Also Read : पडेगाव येथील ‘कचरा डेपो’ हटविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; संतप्त कार्यकर्त्यांनी गेटला ठोकले कुलूप
कमी होत जाणारी शिक्षकांची संख्या मुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाच्या दर्जा खालावलेला आहे . याकरिता वंचित बहुजन आघाडी मार्फत नागपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा लवकरात लवकर भरा, अन्यथा वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करेल असा इशाराही देण्यात आला.
याप्रसंगी निवेदन देताना कार्यालयीन सचिव वैभव येवले, आय. टी. सेल प्रमुख शुभम वाहने उपस्थित होते.






