अकोला : मान्सूनचे आगमन जवळ आले असताना चितलवाडी गावातील सांडपाणी नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ, प्लास्टिक व इतर कचरा साचल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबणे, अस्वच्छता वाढणे तसेच नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन युवा आघाडीचे तेल्हारा तालुका प्रसिद्धीप्रमुख रोहित जानूजी हिवराळे यांनी ग्रामपंचायत सचिव, चितलवाडी यांना निवेदन सादर करून गावातील सर्व सांडपाणी नाल्यांची तातडीने पाहणी करून त्यांची स्वच्छता करण्याची मागणी केली आहे. (Chitalwadi Drain Cleaning)
Also Read : कल्याण हादरले: आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून बापानेच केली मुलीची हत्या; आरोपी वडिलांना अटक
निवेदनात नमूद केल्यानुसार, अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ व कचरा साचल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. वेळेत स्वच्छता न झाल्यास पावसाळ्यात पाणी साचून डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता असून त्यामुळे विविध साथीचे रोग फैलावण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
ग्रामपंचायतीने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन गावातील सर्व नाल्यांची तात्काळ स्वच्छता मोहीम राबवावी आणि नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी रोहित हिवराळे यांनी केली आहे. तसेच मान्सूनपूर्व उपाययोजनांचा भाग म्हणून नाल्यांमधील गाळ व कचरा हटवून पाण्याचा सुरळीत निचरा सुनिश्चित करावा, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
Also Read : लाडकी बहीण योजनेचे चार महिन्यांचे हप्ते रखडले; लाखो महिलांमध्ये नाराजी, 80 लाख लाभार्थी अपात्र
गावातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही बाब अत्यंत महत्त्वाची असून ग्रामपंचायतीने त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (Chitalwadi Drain Cleaning)





