नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षा २०२५ चा निकाल काल जाहीर झाला. या निकालात महाराष्ट्रातील बहुजन समाजातील १७ विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत गरुडझेप घेतली आहे. या यशात मुलींचे वर्चस्व कायम असल्याचे दिसून आले.
या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये ऋतुजा गायकवाड यांनी अखिल भारतीय क्रमांक (AIR) १०६ मिळवत सर्वाधिक यश मिळवले आहे. त्यानंतर मोहिनी जगताप (AIR ३२३), धनश्री अहिरे (AIR ४८९) आणि विशाखा कदम (AIR ५०४) यांनीही उत्तम कामगिरी करत समाजाचे नाव उज्ज्वल केले आहे.
याशिवाय रजत वाळके (AIR ५१४), निखिल तांबे (AIR ५१७), बापुसाहेब गायकवाड (AIR ५६१), अभिषेक टेकाडे (AIR ६१०) आणि अल्पेश ढवळे (AIR ६८७) यांनीही उल्लेखनीय यश मिळवले.
तसेच प्रितम कुमार भाले (AIR ७४२), प्रांजली मेश्राम (AIR ७६७), मनीष झेंडे (AIR ७८८), प्रथमेश शिंदे (AIR ८१७), अतुल राजुरकर (AIR ८६३), रोहित सांगळे (AIR ८६५), सुरेश बोरकर (AIR ९१२) आणि अनिकेत अहिरे (AIR ९४१) यांनीही नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण होत महाराष्ट्राच्या बहुजन समाजाचा गौरव वाढवला आहे.
या सर्व विद्यार्थ्यांच्या यशामुळे समाजातून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या मेहनत, जिद्द आणि चिकाटीमुळे अनेक तरुणांना प्रेरणा मिळत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.






