Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

जलकुंभातील गळती तातडीने थांबवा, दूषित पाणीपुरवठा बंद करा; वंचित बहुजन आघाडीची आयुक्तांकडे मागणी

mosami kewat by mosami kewat
July 9, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
जलकुंभातील गळती तातडीने थांबवा, दूषित पाणीपुरवठा बंद करा; वंचित बहुजन आघाडीची आयुक्तांकडे मागणी
       

नांदेड : नांदेड जिल्ह्यात पिवळी घिराणी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील जलकुंभामधून अनेक दिवसांपासून होत असलेल्या गळतीमुळे आणि नागरिकांना गढूळ व दूषित पाणीपुरवठा होत असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित जलकुंभाची अनेक वर्षांपासून सखोल साफसफाई करण्यात आलेली नाही.  नियमानुसार दर सहा महिन्यांनी जलकुंभाची स्वच्छता करणे आवश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. परिणामी नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असून विविध साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे.

वंचित बहुजन आघाडीने जलकुंभातील गळती तात्काळ बंद करून आवश्यक दुरुस्ती करावी, जलकुंभाची सखोल साफसफाई करून शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा सुरू करावा, अशी ठाम मागणी महानगरपालिका प्रशासनाकडे केली आहे. या मागण्यांवर आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेत तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक ॲड. बिलास शेख, शुक्लोधन गायकवाड, स्थायी समिती सदस्य तथा वंचित बहुजन आघाडी युवकचे महानगर अध्यक्ष राहुल मधुकरराव सोनसळे यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


       
Tags: MaharashtranandedPoliticalStop Water Tank LeakageWater tank Leak
Previous Post

भव्य सभासद नोंदणी अभियान २०२६; उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये वंचितचा झंझावात

Next Post

अमेरिका-इराण तणावाचा भारताला फटका: सेन्सेक्स १६०० अंशांनी घसरला, खनिज तेल भडकले!

Next Post
अमेरिका-इराण तणावाचा भारताला फटका: सेन्सेक्स १६०० अंशांनी घसरला, खनिज तेल भडकले!

अमेरिका-इराण तणावाचा भारताला फटका: सेन्सेक्स १६०० अंशांनी घसरला, खनिज तेल भडकले!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मूग उत्पादकांचा संताप शिगेला; हजारो शेतकऱ्यांचा भोपाळकडे एल्गार, 100 टक्के MSPची ठाम मागणी
बातमी

मूग उत्पादकांचा संताप शिगेला; हजारो शेतकऱ्यांचा भोपाळकडे एल्गार, 100 टक्के MSPची ठाम मागणी

by mosami kewat
July 29, 2026
0

भोपाळ : मध्य प्रदेशात मूग उत्पादक शेतकऱ्यांचा रोष आता रस्त्यावर उतरला आहे. आपल्या घामाच्या पिकाला हमीभाव मिळावा, या मागणीसाठी हजारो...

Read moreDetails
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण अपडेट : पुढील सुनावणीत न्यायालय ठरवणार नियमावली; ॲड. प्रकाश आंबेडकरांची माहिती

सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण अपडेट : पुढील सुनावणीत न्यायालय ठरवणार नियमावली; ॲड. प्रकाश आंबेडकरांची माहिती

July 28, 2026
पॅरा-ॲथलेटिक्समध्ये भारताचा ऐतिहासिक डंका: शर्मिला धनखडची सुवर्ण कामगिरी, शिल्पा शायलाने जिंकले कांस्य

पॅरा-ॲथलेटिक्समध्ये भारताचा ऐतिहासिक डंका: शर्मिला धनखडची सुवर्ण कामगिरी, शिल्पा शायलाने जिंकले कांस्य

July 28, 2026
औरंगाबादमध्ये दूषित पाणीपुरवठ्याविरोधात वंचित बहुजन आघाडीचे जनआक्रोश आंदोलन; समस्या न सुटल्यास पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा

औरंगाबादमध्ये दूषित पाणीपुरवठ्याविरोधात वंचित बहुजन आघाडीचे जनआक्रोश आंदोलन; समस्या न सुटल्यास पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा

July 28, 2026
केवळ डिग्र्या पुरेशा नाहीत: विचारवंत नेतृत्वाची गरज

केवळ डिग्र्या पुरेशा नाहीत: विचारवंत नेतृत्वाची गरज

July 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home