Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

निजामी मराठ्यांपासून फारकत घेतल्याशिवाय गरीब मराठ्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारणार नाही – प्रकाश आंबेडकर

mosami kewat by mosami kewat
October 28, 2025
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
निजामी मराठ्यांपासून फारकत घेतल्याशिवाय गरीब मराठ्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारणार नाही - प्रकाश आंबेडकर

निजामी मराठ्यांपासून फारकत घेतल्याशिवाय गरीब मराठ्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारणार नाही - प्रकाश आंबेडकर

       

परभणी : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) यांनी पुन्हा एकदा मोठे विधान केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, मराठा समाजाला ओबीसीत (OBC) समाविष्ट करण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या (Maharashtra Government) प्रयत्नांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दोन वेळा नकार दिला आहे आणि तो निर्णय कायम राहण्याची शक्यता आहे.

मराठा समाजातील अंतर्गत गटबाजीवर बोट ठेवत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मराठा समाजात ‘निजामी मराठा’ (Nizami Maratha) आणि ‘रयतेचा मराठा’ (Rayatecha Maratha) असे दोन गट आहेत. निजामी मराठे हे निजामाच्या बाजूने राहिलेले, तर रयतेचे मराठे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत राहिलेले आहेत.

सोळाव्या शतकापासूनचा हा संघर्ष आजही सुरू आहे. “सत्तेतील निजामी मराठ्यांमुळे रयतेला न्याय नाही” सत्तेत बसलेला वर्ग हा निजामी मराठ्यांचा असून, त्यांची रयतेतील मराठ्यांना आरक्षण देण्याची मानसिकताच नाही, असा थेट आरोप अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी केला. ते म्हणाले, “जोपर्यंत रयतेतील मराठा हा निजामी मराठ्यांपासून फारकत घेत नाही, तोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही.” रयतेतील मराठ्यांकडे तीन-चार एकर जमीन आहे, ते श्रीमंत नाहीत. त्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा या मागणीलाही निजामी मराठा वर्ग पाठिंबा देत नाही, असे त्यांनी नमूद केले.

पुण्यात SRA विरोधी वंचित बहुजन आघाडीचा विराट धडक मोर्चा’ यशस्वी; प्रशासनाकडून सर्व मागण्या मान्य!

“बदलासाठी मतदारांनी ठरवावे” –

निजामी मराठ्यांच्या हातातून सत्ता रयतेतील मराठ्यांच्या हातात जाईल, या भीतीमुळे सत्तेतील निजामी मराठे रयतेतील मराठ्यांचे प्रश्न सोडवत नाहीत, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. “निजामी मराठ्यांपासून फारकत घेतल्याशिवाय रयतेतील मराठ्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती सुधारणार नाही,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

शेवटी अ‍ॅड. आंबेडकर यांनी रयतेच्या मतदारांना आवाहन केले आहे की, “आता रयतेच्या मतदारांनी ठरवावे की, त्यांना बदल हवा आहे की नाही?”


       
Tags: MaharashtraparbhaniPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

एल आय सी आणि अदानी समूह

Next Post

संघाला धडकी भरविणारा मोर्चा आणि ‘छेडोगे तो छोडेगे नही’ चा अभूतपूर्व इशारा

Next Post
संघाला धडकी भरविणारा मोर्चा आणि ‘छेडोगे तो छोडेगे नही’ चा अभूतपूर्व इशारा

संघाला धडकी भरविणारा मोर्चा आणि ‘छेडोगे तो छोडेगे नही’ चा अभूतपूर्व इशारा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
लंडनमध्ये द्वेषाला स्थान नाही; अमेरिकेनंतर ब्रिटनमध्येही मोहन भागवतच्या दौऱ्याला विरोध; RSS वर बंदी घालण्याची मागणी
बातमी

लंडनमध्ये द्वेषाला स्थान नाही; अमेरिकेनंतर ब्रिटनमध्येही मोहन भागवतच्या दौऱ्याला विरोध; RSS वर बंदी घालण्याची मागणी

by mosami kewat
September 4, 2026
0

लंडन : अमेरिकेच्या दौऱ्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत सध्या ब्रिटन दौऱ्यावर असून, लंडनमधील त्यांच्या प्रस्तावित कार्यक्रमाला विविध...

Read moreDetails
नवी मुंबई: रबाळेतील साईबाबा नगरच्या समस्यांविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; सहाय्यक आयुक्तांनी केली पाहणी

नवी मुंबई: रबाळेतील साईबाबा नगरच्या समस्यांविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; सहाय्यक आयुक्तांनी केली पाहणी

September 4, 2026
गणेशोत्सव आणि पर्यावरणाची जपवणूक : अकोल्यात २० हजार चिमुकल्यांनी साकारल्या शाडूच्या गणेशमूर्ती; प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती! 

गणेशोत्सव आणि पर्यावरणाची जपवणूक : अकोल्यात २० हजार चिमुकल्यांनी साकारल्या शाडूच्या गणेशमूर्ती; प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती! 

September 4, 2026
NCMC स्मार्ट कार्डच्या सक्तीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; सवलत कार्डची अट तात्काळ रद्द करण्याची मागणी

NCMC स्मार्ट कार्डच्या सक्तीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; सवलत कार्डची अट तात्काळ रद्द करण्याची मागणी

September 4, 2026
रेल्वे उत्तर वार्डातील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासाठी प्रशासकीय बैठक; ८० टक्के प्रक्रिया पूर्ण

रेल्वे उत्तर वार्डातील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासाठी प्रशासकीय बैठक; ८० टक्के प्रक्रिया पूर्ण

September 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home