Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मुंबईतील रेल्वे अपघाताची घटना अत्यंत दुःखद आणि मन हेलावणारी – अॅड. प्रकाश आंबेडकर

Prabuddh Bharat by Prabuddh Bharat
June 9, 2025
in बातमी
0
मुंबईतील रेल्वे अपघाताची घटना अत्यंत दुःखद आणि मन हेलावणारी – अॅड. प्रकाश आंबेडकर
       

मुंबई : आज सकाळी दिवा ते मुंब्रा स्थानकावर घडलेली रेल्वे दुर्घटना ही अत्यंत दुःखद आणि मन हेलावणारी आहे. अनेक निष्पाप प्रवाशांचा जीव गमावणे ही गोष्ट कोणत्याही संवेदनशील समाजासाठी असह्य आहे. जर भारतीय रेल्वेने सोशल मीडियावरील रील्सपेक्षा प्रवाशांच्या सुरक्षेकडे लक्ष दिले असते, तर हे कधीच घडले नसते. भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेवर केंद्रित धोरण राबवले असते, आणि सोशल मीडियावरील दिखाऊपणाऐवजी प्रत्यक्ष सुरक्षेवर लक्ष दिले असते, तर ही दुर्घटना टाळता आली असती.

मी शासनाकडे आणि रेल्वे प्रशासनाकडे या घटनेची सखोल, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी करतो, जेणेकरून संपूर्ण सत्य जनतेसमोर येईल आणि जबाबदारी निश्चित होईल. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून केली. दुर्घटनेत जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना तसेच जखमींना तत्काळ आर्थिक आणि वैद्यकीय मदत मिळणे आवश्यक आहे. अशा प्रसंगी सरकारने संवेदनशीलता आणि तत्परता दाखवावी. ही दुर्घटना केवळ एक अपघात म्हणून न नोंदवता एक चेतावणी म्हणून पाहण्याची गरज आहे. भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून सुरक्षा यंत्रणांमध्ये मूलगामी सुधारणा आणि धोरणात्मक कृती आवश्यक आहेत. असेही ते म्हणाले.


       
Tags: accidentAdv. Prakash AmbedkarextremelyheartbreakingincidentMaharashtramumbaiPrakash AmbedkarSADtrainVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

राज्यात 13 जूनपासून मान्सून पुन्हा सक्रीय होणार

Next Post

ग्वालियर खंडपीठात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या स्थापनेचा विरोध एक जातीयवादी मानसिकतेचा प्रताप – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
ग्वालियर खंडपीठात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या स्थापनेचा विरोध एक जातीयवादी मानसिकतेचा प्रताप – ॲड. प्रकाश आंबेडकर

ग्वालियर खंडपीठात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या स्थापनेचा विरोध एक जातीयवादी मानसिकतेचा प्रताप - ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अमेरिका-इराण सहमतीनामा/ करार: टिकेल, तुटेल की..? 
article

अमेरिका-इराण सहमतीनामा/ करार: टिकेल, तुटेल की..? 

by mosami kewat
June 26, 2026
0

- संजीव चांदोरकर  युद्ध थांबले यांचे एकमेव कारण म्हणजे अमेरिका आणि इराण दोघांनाही आता युद्ध नको आहे. बस तेव्हढेच कारण....

Read moreDetails
पाटोदा साठवण तलावामुळे  दलित वस्तीतील १३१ कुटुंबांवर विस्थापनाचे संकट; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

पाटोदा साठवण तलावामुळे  दलित वस्तीतील १३१ कुटुंबांवर विस्थापनाचे संकट; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

June 26, 2026
हे गढूळ पाणी कोणी पिऊन दाखवलं तर त्याचं गुलाबाचं फूल देऊन सत्कार करतो – पराग गवई

हे गढूळ पाणी कोणी पिऊन दाखवलं तर त्याचं गुलाबाचं फूल देऊन सत्कार करतो – पराग गवई

June 26, 2026
पोलिसांत जाऊन कम्प्लेंट करा, मारून पाठवीन ; खासदार संजय पाटलांची पत्रकारांना धमकी!

पोलिसांत जाऊन कम्प्लेंट करा, मारून पाठवीन ; खासदार संजय पाटलांची पत्रकारांना धमकी!

June 25, 2026
मायक्रो फायनान्सचे घटते आकडे: गरिबांच्या आर्थिक विस्थापनाची नांदी?

मायक्रो फायनान्सचे घटते आकडे: गरिबांच्या आर्थिक विस्थापनाची नांदी?

June 25, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home