Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

राज्यात 13 जूनपासून मान्सून पुन्हा सक्रीय होणार

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 9, 2025
in बातमी
0
राज्यात 13 जूनपासून मान्सून पुन्हा सक्रीय होणार
       

मुंबई – हवामान विभागाने महत्वाची माहिती दिली असून राज्यात 13 जूनपासून मान्सून पुन्हा सक्रीय होणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये 9 आणि 10 जून रोजी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. कोकण-गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचे सांगितले आहे.हवामान विभागाने काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. यामध्ये पश्चिम घाट विभागात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

गेल्या 100 वर्षात पडला नाही, येवढा मोठ्या प्रमाणात पाऊस यंदा एकट्या 2025 च्या मे महिन्यात पडला. मात्र त्यानंतर जूनच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये मान्सून राज्यातून गायब झाला आहे. यंदा राज्यात मे महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. या वर्षी 26 मे रोजी वेळेआधी 15 दिवस मान्सून राज्यात दाखल झाला होता. मात्र मान्सूनने जून महिन्यातील पहिल्या दहा दिवस थोडी विश्रांती घेतल्याचे पहायला मिळाले. सध्या राज्यातील शेतकरी मान्सून सक्रीय कधी होणार याची आतुरतेने वाट पाहात आहेत. तर दुसरीकडे मान्सून अभावी राज्यातील सर्वच पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. राज्यात उत्तर महाराष्ट्र अन् विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अद्याप मान्सून दाखल झालेला नाही. त्यामुळे राज्यातील सर्व विभागातील शेतकरी मान्सूनच्या प्रतिक्षेत आहेत.


       
Tags: activeagainJune 13MaharashtraMonsoonstate
Previous Post

डिसेंबर 2025 अखेरपर्यंत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात सौर ऊर्जेचा वापर

Next Post

मुंबईतील रेल्वे अपघाताची घटना अत्यंत दुःखद आणि मन हेलावणारी – अॅड. प्रकाश आंबेडकर

Next Post
मुंबईतील रेल्वे अपघाताची घटना अत्यंत दुःखद आणि मन हेलावणारी – अॅड. प्रकाश आंबेडकर

मुंबईतील रेल्वे अपघाताची घटना अत्यंत दुःखद आणि मन हेलावणारी - अॅड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पुण्यात ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे सामूहिक वाचन उत्साहात संपन्न
बातमी

पुण्यात ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे सामूहिक वाचन उत्साहात संपन्न

by mosami kewat
April 26, 2026
0

पुणे : कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे सामूहिक वाचन पुण्यातील कलाकार कट्टा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार...

Read moreDetails
ट्रम्पने थुंकले अन् मोदींनी चाटले ; ट्रम्प- मोदी संबंधांवर ॲड. प्रकाश आंबेडकर यांची घणाघाती टीका

ट्रम्पने थुंकले अन् मोदींनी चाटले ; ट्रम्प- मोदी संबंधांवर ॲड. प्रकाश आंबेडकर यांची घणाघाती टीका

April 25, 2026
प्रबुद्ध भारतच्या वृत्तावरून वाद; नोटीस पाठवा, मग बघू जितरत्न पटाईत यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर !

प्रबुद्ध भारतच्या वृत्तावरून वाद; नोटीस पाठवा, मग बघू जितरत्न पटाईत यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर !

April 25, 2026
दमोह: दलित नवरदेवाला घोड्यावरून खाली खेचून बेदम मारहाण; जातीवाचक शिवीगाळ करत वरात अडवली

दमोह: दलित नवरदेवाला घोड्यावरून खाली खेचून बेदम मारहाण; जातीवाचक शिवीगाळ करत वरात अडवली

April 25, 2026
नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात ACB चा मोठा दणका; ५ लाखांची लाच स्वीकारताना महसूल सहाय्यक गजाआड!

नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात ACB चा मोठा दणका; ५ लाखांची लाच स्वीकारताना महसूल सहाय्यक गजाआड!

April 25, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home