Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

आदिवासी, सामाजिक न्याय विभागाचा तब्बल 1,827 कोटी रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला

Prabuddh Bharat by Prabuddh Bharat
June 6, 2025
in बातमी
0
आदिवासी, सामाजिक न्याय विभागाचा तब्बल 1,827 कोटी रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला
       

‘लाडकी बहीण’साठी सामाजिक न्याय विभागाला पुन्हा फटका, 410 कोटींचा निधी वळवला

मुंबई – सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गत विधानसभा निवडणुकी आधी सुरु केली होती. गेल्या वर्षी पासून ही योजना सुरु असू्न तेव्हां पासून या लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रूपये सरकार देत आहे. मात्र यंदा हा निधी देण्यासाठी फडणवीस सरकारकडून इतर विभागांच्या निधीला कात्री लावण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहीणींचा फटका आता आदीवासी विभाग व सामाजिक न्याय विभागाला बसतो आहे. आतापर्यंत दोन्ही विभागांचा मिळुन तब्बल 1,827 कोटी रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी महिला आणि बालकल्याण विभागाकडे वळवण्यात आला आहे.

लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी पुन्हा एकदा वळवण्यात आला असून या विभागाचा अनुसूचित जाती घटकांसाठीचा 410.30 कोटींचा निधी वळवण्यात आला आहे. तर दुसरीकडे आदिवासी विभागाचा देखील तब्बल 335 कोटी 70 लाख रुपायांचा निधी लाडक्या बहीणीसांठी वळव्य़ात आला आहे. अशा प्रकारे आत्ता पर्यंत आदीवासी विभागाचा तीन वेळा निधी लाडक्या बहीण योजनेसाठी महिला व बालकल्याण विभागालाा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे गेल्या 5 वर्षाच्य तुलनेत यंदा सामाजिक न्याय विभागाला तब्बल 7,317 कोटी रुपयांचा कमी निधी मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेल्या वर्षभरात आदीवासी विभाग आणि सामाजिक न्याय विभागाचा मिळुन तब्बल 1827 कोटी 70 लाख निधी हा लाडक्या बहीणींसाठी देण्यात आला आहे. यावरून देवेंद्र फडणवीस सरकारवर जोरदार टिका होऊ लागली आहे.


       
Tags: 827 crorebjpDepartmentsdivertedfundsJusticeLadki BahinMaharashtraRs 1SocialTribalVanchit Bahujan Aaghadiwhopping
Previous Post

फडणवीस सरकारने गुंडाळल्या 903 विकास योजना

Next Post

मोदी अनेक देशांमध्ये गेले मात्र भारताच्या बाजून एकही देश उभा राहिला नाही – अॅड. प्रकाश आंबेडकर

Next Post
मोदी अनेक देशांमध्ये गेले मात्र भारताच्या बाजून एकही देश उभा राहिला नाही – अॅड. प्रकाश आंबेडकर

मोदी अनेक देशांमध्ये गेले मात्र भारताच्या बाजून एकही देश उभा राहिला नाही - अॅड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
कोण आहेत वंचित बहुजन आघाडीने नवे प्रदेशाध्यक्ष?
बातमी

कोण आहेत वंचित बहुजन आघाडीने नवे प्रदेशाध्यक्ष?

by mosami kewat
August 5, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी राजेंद्र निरंजन पातोडे यांची निवड झाल्यानंतर राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. परंतु महाराष्ट्रभर त्यांच्या...

Read moreDetails
नवी मुंबईत आरपीआय (आ) गटाला मोठे खिंडार; दिघाचे कार्याध्यक्ष अनिल अंगरख यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश 

नवी मुंबईत आरपीआय (आ) गटाला मोठे खिंडार; दिघाचे कार्याध्यक्ष अनिल अंगरख यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश 

August 5, 2026
शेयर मार्केटमधील , विशेषतः तरुण, गुंतवणूकदारांसाठी “कोरियन” धडे !  

शेयर मार्केटमधील , विशेषतः तरुण, गुंतवणूकदारांसाठी “कोरियन” धडे !  

August 5, 2026
नाशिकमध्ये खड्ड्यांच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचे तिरडी आंदोलन; रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणी

नाशिकमध्ये खड्ड्यांच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचे तिरडी आंदोलन; रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणी

August 5, 2026
लोकशाही पद्धतीने वंचित बहुजन आघाडीची प्रदेश कार्यकारिणी निवड; राजेंद्र पातोडे प्रदेशाध्यक्ष

लोकशाही पद्धतीने वंचित बहुजन आघाडीची प्रदेश कार्यकारिणी निवड; राजेंद्र पातोडे प्रदेशाध्यक्ष

August 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home