औरंगाबाद : गंगापूर तालुक्यातील पुरी येथील (दि. १२) रात्री मातंग वस्तीवर वाळू तस्करांकडून झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने गावाला भेट देऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांची विचारपूस केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, तालुकाध्यक्ष बाबासाहेब दुशिग, तालुका उपाध्यक्ष भास्कर खंडागळे, तालुका सचिव सईद बाबा पठाण, सुमित जाधव, राहुल दुशिग आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सदर प्रकरणात अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, सर्व पीडित बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून, आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळाने यावेळी दिले.





