उल्हासनगर : मुस्लिम समाजाच्या हक्कांसाठी आणि न्याय्य मागण्यांसाठी सातत्याने भूमिका घेणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने उल्हासनगरमधील मुस्लिम बांधवांच्या दफनभूमीच्या प्रश्नावर पुन्हा एकदा आवाज उठवला आहे. मंजूर करण्यात आलेली दफनभूमीची जागा तातडीने उपलब्ध करून द्यावी किंवा त्याऐवजी पर्यायी जागा देण्यात यावी, या मागणीचे निवेदन आज पक्षाच्यावतीने ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज पवार यांनी महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले.
Also Read : भूमिगत गटार कामाची नगरसेवक सचिन गायकवाड यांच्याकडून पाहणी; दर्जेदार कामासह रस्ते पूर्ववत करण्याच्या सूचना
मोहरमच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, सामाजिक सलोखा कायम राहावा आणि कोणताही तणाव निर्माण होऊ नये, यासाठी वंचित बहुजन आघाडीने संयमाची भूमिका घेतली असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, मुस्लिम बांधवांच्या दफनभूमीच्या हक्काचा प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याने तो तातडीने मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. (Muslim Burial Ground)
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मुस्लिम समाजासाठी मंजूर असलेली दफनभूमीची जागा त्वरित हस्तांतरित करावी. तसे शक्य नसल्यास समाजाच्या गरजा लक्षात घेऊन योग्य पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी. हा प्रश्न केवळ सुविधेचा नसून धार्मिक आणि मानवी हक्कांशी संबंधित असल्याचेही निवेदनात अधोरेखित करण्यात आले. (Muslim Burial Ground)
Also Read : नांदेड विधान परिषद निवडणुकीतील मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; प्रशांत इंगोले यांची निवडणूक आयोगाकडे चौकशीची मागणी
यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. मुस्लिम बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी पक्षाचा लढा पुढेही सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


