मुंबई : वॉर्ड क्रमांक 127 मधील बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) बांधलेल्या सार्वजनिक शौचालयाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. शौचालयाची नियमित साफसफाई होत नसल्याने तसेच पाण्याची व्यवस्था नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
Also Read : पानगावात मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव; विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचा ग्रामपंचायतीसमोर हालगी बजाव आंदोलनाचा इशारा
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित सार्वजनिक शौचालयात अनेक दिवसांपासून स्वच्छतेचा अभाव असून अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे परिसरातीलशौचालयाच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. देखभालीकडे बीएमसी प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. स्वच्छतेसाठी कोणताही कर्मचारी नियमितपणे येत नसल्याने शौचालयाची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
दरम्यान, या समस्येची गंभीर दखल घेत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नागरिकांनी शौचालयातील अस्वच्छता, पाण्याचा अभाव आणि देखभालीच्या समस्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
मनमाड नगरपरिषदेच्या जनहितविरोधी ठरावाविरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन
यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बीएमसी प्रशासनाकडे सार्वजनिक शौचालयाची तातडीने स्वच्छता करण्यात यावी, नियमित पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी तसेच आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घेऊन शौचालय नागरिकांसाठी स्वच्छ व सुस्थितीत ठेवावे, अशी मागणी करण्यात आली.
बीएमसीने बांधलेल्या सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था; वंचित बहुजन आघाडीची तातडीच्या कारवाईची मागणी
मुंबई : वॉर्ड क्रमांक 127 मधील बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) बांधलेल्या सार्वजनिक शौचालयाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला...
Read moreDetails



