Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

काँग्रेसने ‘मविआ’ कडे मागणी केलेल्याजागांवर चर्चेसाठी ‘वंचित’ ने दिला प्रस्ताव

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 12, 2024
in राजकीय
0
काँग्रेसने ‘मविआ’ कडे मागणी केलेल्याजागांवर चर्चेसाठी ‘वंचित’ ने दिला प्रस्ताव
       

ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे काँग्रेस अध्यक्षांना पत्र !

मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीची तारीख आता कधीही जाहीर होऊ शकते. मात्र, महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा प्रश्न अजून सुटलेला नाही. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी 10 मार्चला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना लिहिलेले पत्र एक्स हॅंडलवर टाकले आहे. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसने एकत्र बसून ती काँग्रेसच्या मनात असलेल्या आणि मविआमध्ये मागणी केलेल्या सर्व जागांवर चर्चा करावी, असा प्रस्ताव मांडल्याचे आंबेडकरांनी पत्रात म्हटले आहे.

निवडणुका अगदी जवळ येऊन ठेपल्या आहेत. त्यात काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्यातील सहमतीचा अभाव आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम होत नसल्याने हे लक्षात घेऊन मी 9 मार्चला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी  रमेश चेन्निथला यांच्याशी संपर्क साधला होता, असे आंबेडकर यांनी पत्रात नमूद केले आहे.

आमचं फोनवर विस्तृत बोलणं झालं. चेन्निथलाजी यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे) किमान 18 जागांवर ठाम असल्याच्या मुद्यावर त्यांनी चिंता व्यक्त केली असल्याचेही त्यांनी म्हटल्याचा उल्लेख पत्रात आहे.

वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसने एकत्र बसून काँग्रेसच्या मनात असलेल्या आणि मविआमध्ये मागणी केलेल्या सर्व जागांवर चर्चा करावी, असा प्रस्ताव मांडला असल्याचे आंबेडकर म्हटले आहे. तसेच, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात याविषयी आपल्याला सांगतील असे आश्वासन फोनवर दिले. मात्र, आतापर्यंत बाळासाहेब थोरात यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

मला आशा आहे की, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी लवकरच एकत्र बसतील जेणेकरून आम्ही भाजप-आरएसएसचा पराभव करण्यासाठी पुढे जाऊ शकू असेही आंबेडकरांनी म्हटले आहे.


       
Tags: CongressmahavikasaghadiNCPPrakash AmbedkarShivsenaVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

महापालिका आयुक्तांनी कर वसुली खाजगीकरणाचा अहवाल द्या.

Next Post

पांढरीतील प्रवेशद्वाराचा वाद चिघळला

Next Post
पांढरीतील प्रवेशद्वाराचा वाद चिघळला

पांढरीतील प्रवेशद्वाराचा वाद चिघळला

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
लातूरमध्ये NEET परीक्षेच्या मानसिक तणावातून विद्यार्थिनीची गळफास लावून आत्महत्या; याला जबाबदार कोण?
बातमी

लातूरमध्ये NEET परीक्षेच्या मानसिक तणावातून विद्यार्थिनीची गळफास लावून आत्महत्या; याला जबाबदार कोण?

by mosami kewat
May 26, 2026
0

NEET Paper Leak : देशभरात गाजलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणाचे परिणाम आता विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावरही उमटताना दिसत आहेत. लातूर जिल्ह्यातील गोंदेगाव...

Read moreDetails
जागतिक व्यवस्थेचा गणितीय अंत? 

जागतिक व्यवस्थेचा गणितीय अंत? 

May 26, 2026
तमाशा फडातील सोंगाड्या ते पद्मश्री रघुवीर खेडकर !

तमाशा फडातील सोंगाड्या ते पद्मश्री रघुवीर खेडकर !

May 26, 2026
मोदी सरकार शिक्षण व्यवस्थेसाठी कर्दनकाळ ?

मोदी सरकार शिक्षण व्यवस्थेसाठी कर्दनकाळ ?

May 26, 2026
४५ हजारांची लाच स्वीकारताना महिला तलाठी एसीबीच्या जाळ्यात; वसई-विरार महसूल विभागात खळबळ

४५ हजारांची लाच स्वीकारताना महिला तलाठी एसीबीच्या जाळ्यात; वसई-विरार महसूल विभागात खळबळ

May 26, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home