Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अनिल कांबळे यांची ठाम भूमिका : मोबदला वाढविला तरी जमिनी देणार नाही; महामार्ग रद्द झालाच पाहिजे

mosami kewat by mosami kewat
August 16, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
अनिल कांबळे यांची ठाम भूमिका : मोबदला वाढविला तरी जमिनी देणार नाही; महामार्ग रद्द झालाच पाहिजे
       

हिंगोली : शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुरू असलेल्या विरोधाला अधिक तीव्रता आली आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी कोणत्याही परिस्थितीत देणार नसल्याची ठाम भूमिका वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा समन्वयक अनिल कांबळे यांनी व्यक्त केली.

यावेळी आमदार बांगर यांनी शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला वाढवून दिला तर जमिनी द्याव्यात, अशी भूमिका मांडली. मात्र या भूमिकेला अनिल कांबळे यांनी आक्रमकपणे विरोध केला. “मोबदला कितीही वाढवून दिला तरी आम्ही आमच्या जमिनी देणार नाही. प्रश्न केवळ मोबदल्याचा नसून शेतकऱ्यांच्या शेतीचा, उपजीविकेचा आणि भवितव्याचा आहे. त्यामुळे शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे,” अशी ठाम मागणी अनिल कांबळे यांनी केली.

Also Read : फक्त ध्वजारोहणासाठी पालकमंत्री नकोत; जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हवेत : वंचित बहुजन आघाडी

तसेच या प्रश्नावर पालकमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका घेऊन शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहावे, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, शेतकऱ्यांच्या भावना आणि परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी शक्तिपीठ महामार्गाबाबत निर्णय होईपर्यंत हिंगोली जिल्ह्यात शेतीची मोजणी करू नये, अशी सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना दिली.

पालकमंत्र्यांच्या या निर्देशामुळे मोजणीच्या प्रक्रियेमुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र अंतिम मागणी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचीच असल्याचे अनिल कांबळे यांनी स्पष्ट केले. “पालकमंत्र्यांनी निर्णय होईपर्यंत मोजणी करू नये, अशी भूमिका घेतली आहे, त्याचे आम्ही स्वागत करतो. मात्र शेतकऱ्यांच्या जमिनी वाचविण्यासाठी शक्तिपीठ महामार्ग कायमस्वरूपी रद्द करणे हाच अंतिम निर्णय असला पाहिजे. शेतकऱ्यांच्या जमिनी देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही,” असे अनिल कांबळे यांनी स्पष्ट केले.

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी आणि वंचित बहुजन आघाडी ठाम असून, शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयासाठी संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


       
Tags: AgricultureExpresswayFarmerMaharashtraPoliticalVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

राष्ट्रध्वज के अपमान को लेकर प्रकाश आंबेडकर का प्रधानमंत्री मोदी पर निशाना!

Next Post

वरळी: अरुणोदय क्रीडा मंडळाच्या वतीने स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 

Next Post
वरळी: अरुणोदय क्रीडा मंडळाच्या वतीने स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 

वरळी: अरुणोदय क्रीडा मंडळाच्या वतीने स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
महिलांच्या आत्मनिर्भरतेचा महासोहळा! प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते ‘तेजस्वी आत्मनिर्भर महाबाजार’चे भव्य उद्घाटन
बातमी

महिलांच्या आत्मनिर्भरतेचा महासोहळा! प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते ‘तेजस्वी आत्मनिर्भर महाबाजार’चे भव्य उद्घाटन

by mosami kewat
September 5, 2026
0

अकोला : पर्यावरण संवर्धनासोबतच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या अकोला महोत्सवाला शुक्रवारी उत्साहात सुरुवात झाली. या महोत्सवांतर्गत तापडिया नगर येथील...

Read moreDetails
ग्रामपंचायत आरक्षणाच्या नियमांवर वंचित बहुजन आघाडीचा आक्षेप; नियम ७ आणि शून्य लोकसंख्येवरील आरक्षण रद्द करण्याची मागणी

ग्रामपंचायत आरक्षणाच्या नियमांवर वंचित बहुजन आघाडीचा आक्षेप; नियम ७ आणि शून्य लोकसंख्येवरील आरक्षण रद्द करण्याची मागणी

September 5, 2026
‘जय भीम Gen Z!’: वंचित बहुजन आघाडीचा नवा उपक्रम

‘जय भीम Gen Z!’: वंचित बहुजन आघाडीचा नवा उपक्रम

September 5, 2026
वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांमुळे शिरडशहापूरच्या जिल्हा परिषद शाळेला मिळाले ६ शिक्षक

वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांमुळे शिरडशहापूरच्या जिल्हा परिषद शाळेला मिळाले ६ शिक्षक

September 5, 2026
समता सैनिक दलाच्या फलकाची विटंबना; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

समता सैनिक दलाच्या फलकाची विटंबना; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

September 5, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home