Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

दु:खद! समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

mosami kewat by mosami kewat
July 5, 2025
in बातमी
0
दु:खद! समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

दु:खद! समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

       

नागपूर: पुणे येथून नागपूरकडे येत असताना समृद्धी महामार्गावर काल सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास झालेल्या एका भीषण कार अपघातात नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील जयस्वाल कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाला आहे.

कार चालक गंभीर जखमी असून त्यांच्यावर वाशिम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयस्वाल कुटुंब पुण्यात एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेले होते.

पुण्याहून नागपूरच्या उमरेडला परत येत असताना, समृद्धी महामार्गावरील वनोजा-कारंजा दरम्यान चॅनल क्रमांक २१५ येथे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगातील कार दुभाजकाला धडकल्याने हा भीषण अपघात घडला.

या अपघातात वैदेही जयस्वाल (२५), माधुरी जयस्वाल (५२), राधेश्याम जयस्वाल (६७) आणि संगीता जयस्वाल (५५) या चौघांचा मृत्यू झाला. त्यापैकी दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अन्य दोघांचा उपचारादरम्यान दुर्दैवी अंत झाला.

कार चालक चेतन हेलगे (२५) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी प्रयत्न सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्गाची रेस्क्यू टीम आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

मंगरुळपिर पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. एकाच कुटुंबातील चार जणांचा अपघाती मृत्यू झाल्याने उमरेड आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


       
Tags: accidentExpresswaynagpur
Previous Post

Somanath Suryawanshi case : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी पोलिसांवर गुन्हे नोंदवण्याचे आदेश

Next Post

Pune Monsoon : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय ; कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट!

Next Post
महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय ; कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट!

Pune Monsoon : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय ; कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
कोण आहेत वंचित बहुजन आघाडीने नवे प्रदेशाध्यक्ष?
बातमी

कोण आहेत वंचित बहुजन आघाडीने नवे प्रदेशाध्यक्ष?

by mosami kewat
August 5, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी राजेंद्र निरंजन पातोडे यांची निवड झाल्यानंतर राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. परंतु महाराष्ट्रभर त्यांच्या...

Read moreDetails
नवी मुंबईत आरपीआय (आ) गटाला मोठे खिंडार; दिघाचे कार्याध्यक्ष अनिल अंगरख यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश 

नवी मुंबईत आरपीआय (आ) गटाला मोठे खिंडार; दिघाचे कार्याध्यक्ष अनिल अंगरख यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश 

August 5, 2026
शेयर मार्केटमधील , विशेषतः तरुण, गुंतवणूकदारांसाठी “कोरियन” धडे !  

शेयर मार्केटमधील , विशेषतः तरुण, गुंतवणूकदारांसाठी “कोरियन” धडे !  

August 5, 2026
नाशिकमध्ये खड्ड्यांच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचे तिरडी आंदोलन; रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणी

नाशिकमध्ये खड्ड्यांच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचे तिरडी आंदोलन; रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणी

August 5, 2026
लोकशाही पद्धतीने वंचित बहुजन आघाडीची प्रदेश कार्यकारिणी निवड; राजेंद्र पातोडे प्रदेशाध्यक्ष

लोकशाही पद्धतीने वंचित बहुजन आघाडीची प्रदेश कार्यकारिणी निवड; राजेंद्र पातोडे प्रदेशाध्यक्ष

August 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home