Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

टी-२० चा थरार! तिलक-रिंकूची कमाल; पाकिस्तानवर मात करत भारताने कोरले आशिया चषकावर नाव!

mosami kewat by mosami kewat
September 28, 2025
in Uncategorized, क्रीडा
0
टी-२० चा थरार! तिलक-रिंकूची कमाल; पाकिस्तानवर मात करत भारताने कोरले आशिया चषकावर नाव!
       

आशिया चषक 2025 चा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात मोठ्या उत्साहात रंगला. तब्बल 41 वर्षांनंतर भारत-पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी अंतिम सामन्यात आमने-सामने आले. स्पर्धेत एकही सामना न गमावता भारताने आपली अजेय कामगिरी राखली.

अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव करत 5 गडी आणि 2 चेंडू राखून ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयात तिलक वर्मा याने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने खेळलेली दमदार अर्धशतकी खेळी भारताच्या विजयाचा कणा ठरली. या थरारक लढतीत पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 146 धावांचा डाव उभारला आणि भारतासमोर 147 धावांचे लक्ष्य ठेवले.

भारतीय संघाचा फलंदाजी क्रम पाहता हे लक्ष्य सहज गाठता येईल असे वाटत होते. पण पाकिस्तानी गोलंदाजांनी सामन्याच्या सुरुवातीलाच आक्रमकता दाखवत भारताचे काही महत्त्वाचे फलंदाज बाद केले आणि सामन्यावर पकड बसवली.

अशा कठीण क्षणी तिलक वर्माने जबाबदारी घेतली आणि एक बाजू लढवत ठेवली. सुरुवातीला संजू सॅमसनसोबत त्याने भागीदारी रचली आणि नंतर शिवम दुबेच्या साथीनं भारतीय संघाचा डाव सावरण्यात यश मिळवलं. सामना शेवटच्या काही चेंडूंवर पोहोचल्यावर सगळ्यांच्या श्वासाचा ठोका तसाच रोखला गेला.

आणि अखेर शेवटच्या चेंडूवर मैदानात उतरलेल्या रिंकू सिंगने जोरदार चौकार ठोकत भारताला एक ऐतिहासिक विजय मिळवून दिला! साऱ्या देशात जल्लोष उसळला आणि भारताने पुन्हा एकदा आशिया खंडात आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे.


       
Tags: Asia Cup 2025cricketFinal matchIndianPakistanplayerWinner
Previous Post

एमआयएम, भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश; भिवंडीच्या राजकारणात नवे समीकरण!

Next Post

कोरेगावमध्ये ७४ वर्षांच्या लिंगायत महिलेच्या अंत्यविधीस विरोध; मृतदेह तहसील कार्यालयासमोर ठेवत वंचित बहुजन आघाडीचा इशारा

Next Post
कोरेगावमध्ये ७४ वर्षांच्या लिंगायत महिलेच्या अंत्यविधीस विरोध; मृतदेह तहसील कार्यालयासमोर ठेवत वंचित बहुजन आघाडीचा इशारा

कोरेगावमध्ये ७४ वर्षांच्या लिंगायत महिलेच्या अंत्यविधीस विरोध; मृतदेह तहसील कार्यालयासमोर ठेवत वंचित बहुजन आघाडीचा इशारा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
कोण आहेत वंचित बहुजन आघाडीने नवे प्रदेशाध्यक्ष?
बातमी

कोण आहेत वंचित बहुजन आघाडीने नवे प्रदेशाध्यक्ष?

by mosami kewat
August 5, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी राजेंद्र निरंजन पातोडे यांची निवड झाल्यानंतर राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. परंतु महाराष्ट्रभर त्यांच्या...

Read moreDetails
नवी मुंबईत आरपीआय (आ) गटाला मोठे खिंडार; दिघाचे कार्याध्यक्ष अनिल अंगरख यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश 

नवी मुंबईत आरपीआय (आ) गटाला मोठे खिंडार; दिघाचे कार्याध्यक्ष अनिल अंगरख यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश 

August 5, 2026
शेयर मार्केटमधील , विशेषतः तरुण, गुंतवणूकदारांसाठी “कोरियन” धडे !  

शेयर मार्केटमधील , विशेषतः तरुण, गुंतवणूकदारांसाठी “कोरियन” धडे !  

August 5, 2026
नाशिकमध्ये खड्ड्यांच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचे तिरडी आंदोलन; रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणी

नाशिकमध्ये खड्ड्यांच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचे तिरडी आंदोलन; रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणी

August 5, 2026
लोकशाही पद्धतीने वंचित बहुजन आघाडीची प्रदेश कार्यकारिणी निवड; राजेंद्र पातोडे प्रदेशाध्यक्ष

लोकशाही पद्धतीने वंचित बहुजन आघाडीची प्रदेश कार्यकारिणी निवड; राजेंद्र पातोडे प्रदेशाध्यक्ष

August 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home