Weather Update : राज्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांना उष्णतेच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. विशेषतः मुंबईसह अनेक भागांत तापमानात मोठी वाढ झाली असून दुपारच्या वेळेत बाहेर पडणे कठीण होत आहे. विदर्भात परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. (Rising Temperatures)
अकोला येथे तापमान 43.1 अंशांवर पोहोचले असून काल ते जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक तापमान असलेले शहर ठरले. तसेच नागपूरमध्ये 41.4 अंश, अमरावतीत 42.4 अंश, वर्धा 42 अंश, वाशीम 41.6 अंश तर चंद्रपूरमध्ये 41 अंश तापमानाची नोंद झाली आहे. नागपूर वेधशाळेने येत्या आठवड्यात उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
Also Read : बार्टीच्या जाहिरातीवरून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची महासंचालकांना नोटीस; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश
पुढील दोन आठवडे प्रचंड उष्णतेचे राहण्याची शक्यता असून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव आता पूर्णपणे कमी झाला असून पुढील सहा दिवसांत तापमान 45 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, मागील २४ तासांत उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तापमानात वाढ झाली आहे. (Rising Temperatures)
Also Read : रिपब्लिकन सेनेला पुण्यात धक्का; पदाधिकाऱ्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश
मालेगाव, जळगाव आणि सोलापूरमध्ये तापमान ४१ अंशांच्या पुढे गेले असून कोरडे आणि उष्ण वारे वाहत आहेत. विदर्भातील अनेक शहरांमध्ये ४१ ते ४२ अंश तापमान कायम आहे आणि ही स्थिती काही दिवस टिकण्याची शक्यता आहे. जळगाव आणि मालेगावसह काही भागांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. सोलापूरमध्येही दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
सलीम अली सरोवर वाचवण्यासाठी पुढाकार; वंचित बहुजन आघाडीच्या जरिना कुरैशी यांची महापौरांकडे मागणी
औरंगाबाद : औरंगाबादमधील ऐतिहासिक वारसा असलेल्या सलीम अली सरोवराच्या (Salim Ali Lake) संवर्धनासाठी आता नव्याने प्रयत्न सुरू झाले आहेत. वंचित...
Read moreDetails





