Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

राज्यात उष्णतेचा कहर; विदर्भात उष्णलहरींचा इशारा, यलो अलर्ट जारी

Akash Shelar by Akash Shelar
April 24, 2026
in बातमी
0
राज्यात उष्णतेचा कहर; विदर्भात उष्णलहरींचा इशारा, यलो अलर्ट जारी
       

नागपूर: राज्यात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत असून बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाने चाळीशी पार केली आहे. विशेषतः विदर्भात उष्णलहरींचा प्रभाव तीव्र होत चालला असून नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी पुन्हा एकदा यलो अलर्ट जारी केला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील चार दिवस अकोला, बुलढाणा, अमरावती, नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये तापमान 44 ते 45 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा धोका निर्माण झाला असून नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, हलका आहार घ्यावा आणि लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच शेतकरी व कामगारांनी उष्णतेपासून संरक्षणाची खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

विदर्भात उष्णलहरींचा हा तडाखा आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


       
Tags: Maharashtratemperaturevidarbha
Previous Post

गरिबांना विभागा, सत्ता वाचवा : निवडणुकीतील खतरनाक गेम

Next Post

“शिवाजी कोण होता?” सामूहिक वाचनातून कोल्हापुरात विचारजागृती

Next Post
“शिवाजी कोण होता?” सामूहिक वाचनातून कोल्हापुरात विचारजागृती

“शिवाजी कोण होता?” सामूहिक वाचनातून कोल्हापुरात विचारजागृती

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
राज्यात रक्तपेढ्यांवर एफडीएचा मोठा धडाका; ३८ संस्थांवर कारवाई, ३४ परवाने निलंबित
Uncategorized

राज्यात रक्तपेढ्यांवर एफडीएचा मोठा धडाका; ३८ संस्थांवर कारवाई, ३४ परवाने निलंबित

by mosami kewat
July 15, 2026
0

मुंबई : राज्यात अन्नभेसळ आणि अमली पदार्थांविरोधातील कारवाईनंतर आता अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) रक्तपेढ्या आणि रक्त साठवणूक केंद्रांवरही कठोर...

Read moreDetails
ठाण्यात बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल खाडीत वाहून गेला; वंचित बहुजन आघाडीचे सरकारला सवाल

ठाण्यात बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल खाडीत वाहून गेला; वंचित बहुजन आघाडीचे सरकारला सवाल

July 15, 2026
२७०० मिलिनिअर्स रोज, मग गरिबांच्या वाट्याला काय?

२७०० मिलिनिअर्स रोज, मग गरिबांच्या वाट्याला काय?

July 15, 2026
हिप्परगा थडीत वंचित बहुजन आघाडीचा वाढता जनाधार! 

हिप्परगा थडीत वंचित बहुजन आघाडीचा वाढता जनाधार! 

July 15, 2026
ग्रामीण भागातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नवीन स्वस्त धान्य दुकाने सुरू करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

ग्रामीण भागातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नवीन स्वस्त धान्य दुकाने सुरू करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

July 14, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home