नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या दबावाखाली देशाचे सार्वभौमत्व आणि परराष्ट्र धोरण गहाण ठेवले आहे. भारत आता अमेरिकेचे ५१ वे राज्य असल्यासारखा वागत आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. या गंभीर मुद्द्यांवरून ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याची मागणी केली असून, २ मार्च रोजी मुंबईत मोठ्या आंदोलनाची हाक देखील दिली आहे. नागपूर येथील प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ॲड. प्रकाश आंबेडकर बोलत होते.
यावेळी त्यांनी संरक्षण करार, कृषी धोरण आणि परराष्ट्र संबंधांवरून सरकारवर प्रश्न केले. यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, अमेरिका, रशिया आणि इराण यांच्यातील संघर्षात भारताने अमेरिकेच्या आदेशांपुढे शरणागती पत्करली आहे. भारताचे स्वतंत्र परराष्ट्र धोरण आता संपले असून, रशिया आणि इराणच्या विरोधात अमेरिकेची जी भूमिका असेल, तीच भारताला स्वीकारावी लागत आहे. अमेरिकन वस्तूंना दिलेला शुल्क-मुक्त प्रवेश आणि कृषी क्षेत्र खुले केल्यामुळे भारतीय शेतकरी देशोधडीला लागेल, अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली. (prakash ambedkar)
११४ राफेल विमानांच्या खरेदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना ॲड. आंबेडकर म्हणाले की, ज्या कंपनीकडून आपण राफेल खरेदी करत आहोत, ती आता अमेरिकन कंपनीच्या मालकीची झाली आहे. जर फ्रान्सने ‘सोर्स कोड’ दिला नाही आणि अमेरिकेने परवाना नाकारला, तर १ लाख १० हजार कोटी रुपये खर्च करून आपण केवळ ‘लोखंड’ खरेदी केले आहे, असे म्हणावे लागेल. रशियाने सुखोई विमानांचे तंत्रज्ञान देण्याची तयारी दर्शवली असतानाही, तो प्रस्ताव का नाकारला? असा सवाल त्यांनी केला. (prakash ambedkar)
पुढे ॲड. प्रकाश आंबेडकरांनी आरोप करत म्हटले की, अमेरिकेतील ‘एपस्टीन फाईल’मध्ये भारताच्या तीन व्यक्तींची नावे समोर येत आहेत, ज्यात पंतप्रधानांचे नाव असल्याचे बोलले जात आहे. या फाईलमुळे देशाच्या प्रतिमेला जागतिक स्तरावर धक्का बसला असून, ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले.
मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, ममता बॅनर्जी आणि एम.के. स्टालिन यांसारख्या विरोधी नेत्यांनी केवळ संसदेतच नव्हे, तर रस्त्यावर उतरून या मुद्द्यांवर आवाज उठवावा, असे आवाहन ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
प्रमुख मागण्या आणि इशारा:
१) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने पदाचा राजीनामा द्यावा.
२) रशियाचा विमान तंत्रज्ञानाचा प्रस्ताव का नाकारला, याचे उत्तर द्यावे.
३) २ मार्च रोजी मुंबईत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
आर्थिक विषमता: देशाच्या दीर्घकालीन आरोग्याला लागलेली वाळवी
- संजीव चांदोरकर UBS Global Wealth Report २०२६: भारतसंदर्भात टिपणे २०२५ अखेरीस भारतात ९,४४,००० नागरिक डॉलर्स मिलिनॉयर आहेत. डॉलर मिलिओनॉयर...
Read moreDetails






