Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

महाराष्ट्र सरकार हे चोरांचे सरकार; ओला दुष्काळ न जाहीर केल्याने सरकारवर प्रकाश आंबेडकरांची टीका

mosami kewat by mosami kewat
October 1, 2025
in बातमी
0
महाराष्ट्र सरकार हे चोरांचे सरकार; ओला दुष्काळ न जाहीर केल्याने सरकारवर प्रकाश आंबेडकरांची टीका

महाराष्ट्र सरकार हे चोरांचे सरकार; ओला दुष्काळ न जाहीर केल्याने सरकारवर प्रकाश आंबेडकरांची टीका

       

अकोला  : राज्यातील मुसळधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या शेतात कमरे एवढं पाणी साचलं आहे. यंदा शेतीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीदेखील राज्य सरकारने अद्याप ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही.

“महाराष्ट्र शासन हे चोरांचे शासन आहे. जर ओला दुष्काळ जाहीर केला तर शेतकऱ्यांना खावटी द्यावी लागेल. त्यामुळे अधिकाऱ्यांचे आणि सत्ताधाऱ्यांचे कमिशन कमी होऊ नये, म्हणूनच सरकारने ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही.” अशी गंभीर टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

ते म्हणाले की, “ओला दुष्काळ जाहीर झाल्यास शेतकऱ्यांना खावटी मिळेल आणि सर्वेक्षण झाल्यानंतर संपूर्ण मोबदला देखील मिळतो. मात्र सरकार जाणूनबुजून टाळाटाळ करत आहे. पाऊस ओसरल्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही, त्यामुळे आत्ताच तो जाहीर करणे आवश्यक आहे.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल करत आंबेडकर म्हणाले, “ओला दुष्काळ का जाहीर केला नाही? याचा खुलासा त्यांनी करावा.”

याचबरोबर मतदारांना आवाहन करताना त्यांनी सांगितले, “जात, धर्म पाहून मतदान करू नका. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पक्षांना आता मतदारांनीच धडा शिकवला पाहिजे.”


       
Tags: AgriculturalAkolaFarmerMaharashtraMonsoonPrakash AmbedkarrainRainfallVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

सोनम वांगचुक कुठे आहेत? लडाखच्या मागणीवर भाजपचे उत्तर हिंसाचार – सुजात आंबेडकरांचा संतप्त सवाल

Next Post

बौद्ध धम्मानेच जगाचा उद्धार..!

Next Post
बौद्ध धम्मानेच जगाचा उद्धार..!

बौद्ध धम्मानेच जगाचा उद्धार..!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
“बिबट्याला घरातच कोंडलं अन् मुलाचा जीव वाचवला”; ६५ वर्षीय गंगुबाई गायकवाड यांच्या धाडसाला सलाम !
बातमी

“बिबट्याला घरातच कोंडलं अन् मुलाचा जीव वाचवला”; ६५ वर्षीय गंगुबाई गायकवाड यांच्या धाडसाला सलाम !

by Akash Shelar
May 16, 2026
0

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील खरशिंदे गावात घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून, ६५ वर्षीय गंगुबाई गायकवाड यांच्या धाडसाची...

Read moreDetails
आंबेडकरी कार्यकर्ते डॉ. राहुल ससाणे यांना गप्प करण्याचा प्रयत्न? विद्यापीठ प्रशासनाची कारवाई !

आंबेडकरी कार्यकर्ते डॉ. राहुल ससाणे यांना गप्प करण्याचा प्रयत्न? विद्यापीठ प्रशासनाची कारवाई !

May 14, 2026
देश आणि राज्यातील परीक्षा घोटाळ्याचा अमृतकाळ !

देश आणि राज्यातील परीक्षा घोटाळ्याचा अमृतकाळ !

May 14, 2026
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले ‘भूमिका’ नाटकाचे कौतुक

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले ‘भूमिका’ नाटकाचे कौतुक

May 13, 2026
ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ‘मुसलमानों का सियासी अजेंडा’ पुस्तकाचे प्रकाशन; मुस्लिम राजकारणावर मांडली रोखठोक मते

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ‘मुसलमानों का सियासी अजेंडा’ पुस्तकाचे प्रकाशन; मुस्लिम राजकारणावर मांडली रोखठोक मते

May 9, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home