Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

महाराष्ट्र सरकार हे चोरांचे सरकार; ओला दुष्काळ न जाहीर केल्याने सरकारवर प्रकाश आंबेडकरांची टीका

mosami kewat by mosami kewat
October 1, 2025
in बातमी
0
महाराष्ट्र सरकार हे चोरांचे सरकार; ओला दुष्काळ न जाहीर केल्याने सरकारवर प्रकाश आंबेडकरांची टीका

महाराष्ट्र सरकार हे चोरांचे सरकार; ओला दुष्काळ न जाहीर केल्याने सरकारवर प्रकाश आंबेडकरांची टीका

       

अकोला  : राज्यातील मुसळधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या शेतात कमरे एवढं पाणी साचलं आहे. यंदा शेतीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीदेखील राज्य सरकारने अद्याप ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही.

“महाराष्ट्र शासन हे चोरांचे शासन आहे. जर ओला दुष्काळ जाहीर केला तर शेतकऱ्यांना खावटी द्यावी लागेल. त्यामुळे अधिकाऱ्यांचे आणि सत्ताधाऱ्यांचे कमिशन कमी होऊ नये, म्हणूनच सरकारने ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही.” अशी गंभीर टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

ते म्हणाले की, “ओला दुष्काळ जाहीर झाल्यास शेतकऱ्यांना खावटी मिळेल आणि सर्वेक्षण झाल्यानंतर संपूर्ण मोबदला देखील मिळतो. मात्र सरकार जाणूनबुजून टाळाटाळ करत आहे. पाऊस ओसरल्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही, त्यामुळे आत्ताच तो जाहीर करणे आवश्यक आहे.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल करत आंबेडकर म्हणाले, “ओला दुष्काळ का जाहीर केला नाही? याचा खुलासा त्यांनी करावा.”

याचबरोबर मतदारांना आवाहन करताना त्यांनी सांगितले, “जात, धर्म पाहून मतदान करू नका. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पक्षांना आता मतदारांनीच धडा शिकवला पाहिजे.”


       
Tags: AgriculturalAkolaFarmerMaharashtraMonsoonPrakash AmbedkarrainRainfallVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

सोनम वांगचुक कुठे आहेत? लडाखच्या मागणीवर भाजपचे उत्तर हिंसाचार – सुजात आंबेडकरांचा संतप्त सवाल

Next Post

बौद्ध धम्मानेच जगाचा उद्धार..!

Next Post
बौद्ध धम्मानेच जगाचा उद्धार..!

बौद्ध धम्मानेच जगाचा उद्धार..!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
ट्रम्प-मोदी व्यापार युद्ध: बदललेले संदर्भ आणि भारतापुढील आव्हान
बातमी

ट्रम्प-मोदी व्यापार युद्ध: बदललेले संदर्भ आणि भारतापुढील आव्हान

by mosami kewat
February 24, 2026
0

-संजीव चांदोरकर ट्रम्प यांनी एप्रिल २०२५ आणि फेब्रुवारी २०२६ मध्ये लावलेल्या आयात करात महत्वाचा फरक आहे ! आपले ऐकले नाही...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी आणि वरळी बी.डी.डी. चाळ क्रमांक ८८, ८९ यांच्या आंदोलनाला मोठे यश!

वंचित बहुजन आघाडी आणि वरळी बी.डी.डी. चाळ क्रमांक ८८, ८९ यांच्या आंदोलनाला मोठे यश!

February 24, 2026
अकोला: संत गाडगेबाबा जयंती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उत्साहात साजरी

अकोला: संत गाडगेबाबा जयंती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उत्साहात साजरी

February 24, 2026
देशाचे सार्वभौमत्व अमेरिकेच्या दावणीला; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधानांवर निशाणा

देशाचे सार्वभौमत्व अमेरिकेच्या दावणीला; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधानांवर निशाणा

February 24, 2026
जालना : घरकुल लाभार्थ्यांचे रखडलेले हप्ते तात्काळ जमा करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

जालना : घरकुल लाभार्थ्यांचे रखडलेले हप्ते तात्काळ जमा करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

February 24, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home