अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यात तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून चाळीसहून अधिक भारतीय थोडक्यात बचावल्याच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधानांवर टीका केली आहे.
सामाजिक माध्यमावरील आपल्या पोस्टमध्ये ॲड. आंबेडकर यांनी म्हटले की, “तीन भारतीयांचा मृत्यू झाला आहे आणि चाळीसहून अधिक जण थोडक्यात बचावले आहेत. मात्र अमेरिकेकडून झालेल्या या घटनेबद्दल पंतप्रधानांनी अद्याप सार्वजनिकरीत्या दुःख व्यक्त केलेले नाही. तसेच अमेरिकेला कोणताही जाब विचारलेला दिसत नाही.”
Also Read : बाळापुरात ‘स्वाभिमानी सप्ताह’ निमित्त पाच दिवसीय बाल श्रामणेर शिबिर उत्साहात संपन्न
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत, मृत भारतीयांच्या कुटुंबियांना आणि देशाला या घटनेबाबत उत्तर मिळाले पाहिजे, अशी मागणी केली. अमेरिकेच्या कारवाईबाबत केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.





