मुंबई : भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, मुंबई येथे बौद्ध समाजाच्या सामाजिक, धार्मिक आणि राजकीय मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
यावेळी येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजाच्या प्रतिनिधीत्वाबाबत रणनीती ठरवण्यात आली. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले.
त्यांनी समाजाच्या विविध मागण्यांवर भाष्य करताना संघटनात्मक बळकटतेवर भर देण्याचे आवाहन केले. बैठकीस भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रस्त्याची ओळख घराच्या नावाने नव्हे, अधिकृत क्रमांकाने करा! मनमाड नगरपरिषदेकडे वंचित बहुजन आघाडीची मागणी
मनमाड : मनमाड शहरातील“रस्त्याची ओळख घराच्या नावाने नव्हे, अधिकृत क्रमांकाने करा!” सार्वजनिक रस्त्यांना अधिकृत नाव अथवा क्रमांक देऊनच नगरपरिषदेच्या विकासकामांची...
Read moreDetails






