पुणे : जगद्गुरु संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्याचे आज पुण्यातून पंढरपूरकडे प्रस्थान झाले. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी पुणे शहर व हडपसर विधानसभा मतदारसंघाच्यावतीने वारकऱ्यांसाठी विशेष सेवा उपक्रम राबविण्यात आला.
वारकऱ्यांना राजगिरा लाडू, केळी, पाण्याच्या बाटल्या, वेफर्स तसेच वैद्यकीय सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय महासचिव अॅड. प्रियदर्शी तेलंग, शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे, महासचिव विश्वास गदादे, विकास भेगडे, सतिश साबळे, पितांबर धिवार, नवनीत अहिरे, अजित पानसरे, सतिश रणवरे, शाम गोरे, नागेश भोसले, बी. पी. सावळे सर, अरविंद कांबळे, संदीप चौधरी, दिलीप क्षेत्रे, रवींद्र गायकवाड, कल्याण चौधरी, कोमल शेलार, शिंदे ताई, दादासाहेब गायकवाड, दिपक गायकवाड, राहुल दहिरे, प्रज्योत गायकवाड, योगेश वानखेडे आणि सुमित हतांगळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या उपक्रमामुळे वारी मार्गावरील हजारो वारकऱ्यांना दिलासा मिळाला.
आपले हक्क, अधिकार मिळवण्यासाठी भटके विमुक्तांनी निवडणुकीत आपल्या मतांची दहशत निर्माण करावी ― ॲड. प्रकाश आंबेडकर
पुणे : आदिवासी भटके विमुक्तांनी देशाच्या आणि राज्याच्या निवडणुकीत आपल्या मतांची दहशत निर्माण केली पाहिजे तरच तुम्हाला तुमचे हक्क आणि...
Read moreDetails






