Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मणिपूर हिंसाचार: ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; उपस्थित केले सात प्रश्न

mosami kewat by mosami kewat
September 14, 2025
in बातमी
0
मणिपूर हिंसाचार: ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; उपस्थित केले सात प्रश्न

मणिपूर हिंसाचार: ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; उपस्थित केले सात प्रश्न

       

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मणिपूरमधील हिंसाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मोदींनी मणिपूरला ‘भारताच्या मुकुटातील रत्न’ म्हटल्याच्या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सरकारवर जातीय शुद्धीकरण, सत्य दडपणे आणि न्यायाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.

‎ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून सात प्रश्न विचारत मोदींच्या या शब्दांना ‘क्रूर थट्टा’ म्हटले आहे. त्यांनी माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर ख्रिश्चन कुकींचे जातीय शुद्धीकरण घडवून आणल्याचा जोरदार टीका केली आहे. लीक झालेल्या ऑडिओ टेप्समध्ये बिरेन सिंग हेच हिंसाचाराचे मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाल्याचा त्यांनी बोलले.

‎प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केलेले महत्त्वाचे प्रश्न:

‎१) जर मणिपूर ‘रत्न’ असेल, तर बिरेन सिंग यांच्या सरकारने ख्रिश्चन कुकींचे जातीय शुद्धीकरण का घडवून आणले? ऑडिओ टेप्समध्ये बिरेन सिंग हेच हिंसाचाराचे मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट होते, असेही त्यांनी म्हटले.

‎२) ख्रिश्चन कुकींची घरे लुटली जात असताना, जाळली जात असताना आणि हजारो लोक विस्थापित होत असताना, मोदी गप्प का राहिले? महिलांवर दिवसाढवळ्या अत्याचार होत असताना पंतप्रधान शांत का होते?

‎३) हिंसाचाराच्या काळात मोदींनी मणिपूरला भेट का दिली नाही? ‘रत्न’ रक्तबंबाळ आणि जाळले जात असताना ते इतर राज्यांमध्ये प्रचार का करत होते?

‎४) मोदी सरकारने मणिपूरमधील सामूहिक हत्याकांड, लैंगिक हिंसाचार आणि जाळपोळीची स्वतंत्र न्यायालयीन चौकशी करण्यास नकार का दिला? मोदी कोणते सत्य लपवत आहेत आणि ते कोणाचे रक्षण करत आहेत, असा सवालही त्यांनी विचारला.

‎५) आपल्या देखरेखीखाली होत असलेला रक्तपात थांबवण्यासाठी काहीही न करता मोदी मणिपूरला ‘रत्न’ कसे म्हणू शकतात?

‎ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या प्रश्नांच्या माध्यमातून मोदी सरकारची नैतिकता आणि मणिपूरच्या प्रश्नावरील त्यांची भूमिका यावर जोरदार टीका केली आहे.


       
Tags: bjpBJP Manipur CrisisHuman RightsmanipurManipur ViolencemodimumbaiPrakash Ambedkar
Previous Post

Mental Health : जगातील प्रत्येक ७ पैकी १ व्यक्ती मानसिक विकारांनी त्रस्त, WHO चा धक्कादायक अहवाल

Next Post

Pune Metro Negligence : पुणे मेट्रोच्या नियोजनशून्य कामामुळे पिंपरीत १६ दुचाकीचालक जखमी

Next Post
Pune Metro Negligence : पुणे मेट्रोच्या नियोजनशून्य कामामुळे पिंपरीत १६ दुचाकीचालक जखमी

Pune Metro Negligence : पुणे मेट्रोच्या नियोजनशून्य कामामुळे पिंपरीत १६ दुचाकीचालक जखमी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
NEET परीक्षा लिक प्रकरण : सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचा तीव्र आक्रोश
बातमी

NEET परीक्षा लिक प्रकरण : सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचा तीव्र आक्रोश

by mosami kewat
June 20, 2026
0

पुणे : पुणे विद्यापीठात शुक्रवारी (दि. १९) नीट पेपरफुटी विरोधात वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्यावतीने आंदोलन करण्यात आले....

Read moreDetails
परीक्षा व्यवस्थे विरोधात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून तीव्र निषेध ; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

परीक्षा व्यवस्थे विरोधात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून तीव्र निषेध ; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

June 19, 2026
16 चेंडूंत अर्धशतक, 34 चेंडूंत शतक; बिहारच्या अक्षरा गुप्ताचे वादळी त्रिशतक, 126 चेंडूंत 306 धावांची ऐतिहासिक खेळी

16 चेंडूंत अर्धशतक, 34 चेंडूंत शतक; बिहारच्या अक्षरा गुप्ताचे वादळी त्रिशतक, 126 चेंडूंत 306 धावांची ऐतिहासिक खेळी

June 19, 2026
चीन १३०० दशलक्ष बॅरल्स वि भारत २० दशलक्ष बॅरल्स!

चीन १३०० दशलक्ष बॅरल्स वि भारत २० दशलक्ष बॅरल्स!

June 19, 2026
वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली भटके-विमुक्त समाजाच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक

वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली भटके-विमुक्त समाजाच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक

June 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home