Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मणिपूर हिंसाचार: ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; उपस्थित केले सात प्रश्न

mosami kewat by mosami kewat
September 14, 2025
in बातमी
0
मणिपूर हिंसाचार: ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; उपस्थित केले सात प्रश्न

मणिपूर हिंसाचार: ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; उपस्थित केले सात प्रश्न

       

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मणिपूरमधील हिंसाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मोदींनी मणिपूरला ‘भारताच्या मुकुटातील रत्न’ म्हटल्याच्या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सरकारवर जातीय शुद्धीकरण, सत्य दडपणे आणि न्यायाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.

‎ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून सात प्रश्न विचारत मोदींच्या या शब्दांना ‘क्रूर थट्टा’ म्हटले आहे. त्यांनी माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर ख्रिश्चन कुकींचे जातीय शुद्धीकरण घडवून आणल्याचा जोरदार टीका केली आहे. लीक झालेल्या ऑडिओ टेप्समध्ये बिरेन सिंग हेच हिंसाचाराचे मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाल्याचा त्यांनी बोलले.

‎प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केलेले महत्त्वाचे प्रश्न:

‎१) जर मणिपूर ‘रत्न’ असेल, तर बिरेन सिंग यांच्या सरकारने ख्रिश्चन कुकींचे जातीय शुद्धीकरण का घडवून आणले? ऑडिओ टेप्समध्ये बिरेन सिंग हेच हिंसाचाराचे मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट होते, असेही त्यांनी म्हटले.

‎२) ख्रिश्चन कुकींची घरे लुटली जात असताना, जाळली जात असताना आणि हजारो लोक विस्थापित होत असताना, मोदी गप्प का राहिले? महिलांवर दिवसाढवळ्या अत्याचार होत असताना पंतप्रधान शांत का होते?

‎३) हिंसाचाराच्या काळात मोदींनी मणिपूरला भेट का दिली नाही? ‘रत्न’ रक्तबंबाळ आणि जाळले जात असताना ते इतर राज्यांमध्ये प्रचार का करत होते?

‎४) मोदी सरकारने मणिपूरमधील सामूहिक हत्याकांड, लैंगिक हिंसाचार आणि जाळपोळीची स्वतंत्र न्यायालयीन चौकशी करण्यास नकार का दिला? मोदी कोणते सत्य लपवत आहेत आणि ते कोणाचे रक्षण करत आहेत, असा सवालही त्यांनी विचारला.

‎५) आपल्या देखरेखीखाली होत असलेला रक्तपात थांबवण्यासाठी काहीही न करता मोदी मणिपूरला ‘रत्न’ कसे म्हणू शकतात?

‎ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या प्रश्नांच्या माध्यमातून मोदी सरकारची नैतिकता आणि मणिपूरच्या प्रश्नावरील त्यांची भूमिका यावर जोरदार टीका केली आहे.


       
Tags: bjpBJP Manipur CrisisHuman RightsmanipurManipur ViolencemodimumbaiPrakash Ambedkar
Previous Post

Mental Health : जगातील प्रत्येक ७ पैकी १ व्यक्ती मानसिक विकारांनी त्रस्त, WHO चा धक्कादायक अहवाल

Next Post

Pune Metro Negligence : पुणे मेट्रोच्या नियोजनशून्य कामामुळे पिंपरीत १६ दुचाकीचालक जखमी

Next Post
Pune Metro Negligence : पुणे मेट्रोच्या नियोजनशून्य कामामुळे पिंपरीत १६ दुचाकीचालक जखमी

Pune Metro Negligence : पुणे मेट्रोच्या नियोजनशून्य कामामुळे पिंपरीत १६ दुचाकीचालक जखमी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटीच्या निषेधार्थ ठाण्यात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे धरणे आंदोलन
बातमी

NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटीच्या निषेधार्थ ठाण्यात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे धरणे आंदोलन

by mosami kewat
May 30, 2026
0

ठाणे : NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण, शिक्षण क्षेत्रातील वाढता भ्रष्टाचार आणि व्यापारीकरणाच्या विरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन...

Read moreDetails
गाढे गव्हाण येथील कथित गावगुंडांवर कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडीचे  जालना एसपी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

गाढे गव्हाण येथील कथित गावगुंडांवर कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडीचे  जालना एसपी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

May 30, 2026
सगरोळीत २३ लाखांच्या सीसी रोड कामाला सुरुवात; वंचितचे जिल्हाध्यक्ष शंकर महाजन यांच्या प्रयत्नांना यश

सगरोळीत २३ लाखांच्या सीसी रोड कामाला सुरुवात; वंचितचे जिल्हाध्यक्ष शंकर महाजन यांच्या प्रयत्नांना यश

May 30, 2026
मुक्ती कोण पथेची ९० वर्षे आणि आजचे आव्हान!

मुक्ती कोण पथेची ९० वर्षे आणि आजचे आव्हान!

May 30, 2026
NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

May 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home