अमरावती : महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू करून देशात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. हा इतिहास संपूर्ण जगाला माहीत असून ऐतिहासिक पुराव्यांवर आधारित आहे.
परंतु, बालभारतीच्या चालू शैक्षणिक वर्षाच्या (२०२६-२७) इयत्ता ३ री मधील ‘आपल्या सभोवतालचे जग भाग-२’ या पाठ्यपुस्तकात या शाळेचा उल्लेख ‘महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा’ असा संकुचित करण्यात आला असून इतिहासाची छेडछाड करण्यात आला आहे. ही माहिती समोर येताच नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. (First Girls’ School in India)
Also Read : FIH Nations Cup 2026 : भारतीय महिला हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी; न्यूझीलंडचा पराभव करत पटकावला ‘नेशन्स कप’!
ही महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली ही शाळा देशातील (भारतातील) पहिली शाळा आहे. तरीही या शाळेचा उल्लेख महाराष्ट्रापुरता मर्यादित करण्यात आल्याने बालभारतीची ही घोडचूक तातडीने दुरुस्त करण्यात यावी, अशी मागणी विविध संघटने मार्फत करण्यात येत आहे.
राष्ट्रीय स्मारकांमधील नोंदी आणि विविध प्रामाणिक संदर्भ ग्रंथांमध्ये या शाळेचा उल्लेख ‘देशातील पहिली शाळा’ असाच आहे. पाठ्य पुस्तकातील या मर्यादित उल्लेखामुळे ऐतिहासिक सत्याचा संकोच होत असून विद्यार्थ्यांपर्यंत चुकीचा इतिहास पोहोचत आहे. (First Girls’ School in India)
Also Read : जीडीपीची भरारी आणि सामान्यांचे जगणे: विकासाच्या गणितात आमचे ‘हित’ कुठे आहे?
बालभारतीसारख्या शासकीय संस्थेकडून राष्ट्रपुरुषांच्या महान कार्याबाबत अशी चूक होणे अत्यंत संतापजनक असून, यामुळे भावी पिढीमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. या चुकीमुळे संपूर्ण राज्यातील शैक्षणिक वर्तुळात आणि समाजमनात तीव्र असंतोष पसरला आहे. अशा प्रकारे महापुरुषांचे कार्याला संकुचित करणे लाजिरवाणी बाब आहे. आणि महाराष्ट्रात महापुरुषांचे अशाप्रकारे प्रकार खपवून घेणार आणि तातडीने यावर बालभारतीने स्पष्टीकर द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.





