Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

जरांगे यांनी जालन्यातून निवडणूक लढवावी

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 14, 2024
in राजकीय
0
जरांगे यांनी जालन्यातून निवडणूक लढवावी
       

ॲड. प्रकाश आंबेडकर : सरकारकडून जरांगेंच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष !

मुंबई : आम्ही जरांगे पाटील यांना निरोप पाठवला आहे की, त्यांनी हा लढा स्वतःच्या शरीराचा त्याग करून करण्यात काहीही अर्थ नाही. उपोषणातून जागृती करायची होती, ती झाली आहे. आता आरक्षण मिळविण्याचा भाग आहे असं आम्ही मानतो. म्हणून, जरांगे पाटील यांनी येत्या लोकसभेत कोणत्याही पक्षाचा आधार न घेता जालना येथील लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवली पाहिजे, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

कोणत्याही पक्षाच्या आधाराने लढले, तर त्या पक्षांची बंधने येतात आणि बंधने असली की, गरीब मराठ्यांचे प्रश्न लोकसभेत मांडता येणार नाहीत. त्यामुळे त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

गरीब मराठ्यांचे आणि ओबिसीचे ताट वेगळे हवे पक्षाच्यावतीने आम्ही भूमिका जाहीर केली आहे की, ओबीसींच्या ताटात मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही, तसं झालं तर टिकणारे आरक्षण मिळणार नाही. म्हणून गरीब मराठ्यांचे ताट आणि ओबीसींचे ताट वेगळं असावं अशी आमची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

मनोज जरांगे यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करावी. ते निवडून येतील, अशी आम्हाला खात्री आहे. लोकसभेच्या निमित्ताने गरीब मराठ्यांचा प्रश्न सोडवण्यात येतो हे आम्ही त्यांना सांगणार आहोत. ते मान्य करतील अशी अपेक्षाही आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.

ओबीसींमध्ये राजकीय जागृती झाली याबाबत मला आनंद आहे. आता खऱ्या अर्थाने लोकशाहीची सुरुवात झाली असे मी मानतो. आपल्या अधिकारांची लढाई असे स्वरूप आता येत आहे आणि भाजपची धार्मिक विचारधारा गळून पडत आहे असे आम्ही मानत असल्याचेही त्यांनी सांगितले.

…ते काँग्रेसवालेच सांगू शकतील –

पत्रकारांनी अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर प्रश्न विचाराला असता ॲड. आंबेडकरांनी म्हटले की, अशोक चव्हाण हे भाजपमध्ये का गेले ? याचं उत्तर काँग्रेसवाल्यांनीच द्यायला पाहिजे. इतर कोणीच यावर उत्तर देऊ शकत नाही असे मला वाटते.


       
Tags: Devendra FadanvisEknath ShindeMaharashtramaharashtrgovernmentMarathaMaratha ReservationobcPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

अकोला म्हणतोय “ये दिल मांगे… बालासाहब आंबेडकर”

Next Post

…तर टिकणारे आरक्षण मिळणार नाही – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
…तर टिकणारे आरक्षण मिळणार नाही – ॲड. प्रकाश आंबेडकर

...तर टिकणारे आरक्षण मिळणार नाही - ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
परंडा येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी
बातमी

परंडा येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

by mosami kewat
April 11, 2026
0

उस्मानाबाद : क्रांतीसूर्य, सत्यशोधक महात्मा जोतिराव फुले यांची १९९वी जयंती परंडा शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात...

Read moreDetails
शहीद सुशील तेलगोटे यांच्या कुटुंबीयांचे सुजात आंबेडकर यांच्याकडून सांत्वन

Akola : शहीद सुशील तेलगोटे यांच्या कुटुंबीयांचे सुजात आंबेडकर यांच्याकडून सांत्वन

April 11, 2026
कल्याणात रिपब्लिकन सेनेला धक्का; कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

कल्याणात रिपब्लिकन सेनेला धक्का; कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

April 11, 2026
समतेचा पाया फुले, कळस आंबेडकर

समतेचा पाया फुले, कळस आंबेडकर

April 11, 2026
सुजात आंबेडकर यांच्याकडून महात्मा फुलेंना अभिवादन !

सुजात आंबेडकर यांच्याकडून महात्मा फुलेंना अभिवादन !

April 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home