Hamirpur Bridge Collapse : उत्तर प्रदेशमध्ये हमीरपुर जिल्ह्यात गुरुवारी उशिरा रात्री एक मोठी दुर्घटना घडली. बेतवा नदीवर सुरू असलेल्या निर्माणाधीन पुलाचा एक मोठा भाग अचानक कोसळल्याने सहा मजुरांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत अनेक मजूर अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Hamirpur Bridge Collapse)
घटनेची माहिती मिळताच प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अडकलेल्या मजुरांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून जेसीबी आणि अन्य यंत्रसामग्रीच्या मदतीने ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. काही मजूर गंभीर जखमी झाल्याचीही माहिती समोर येत आहे.
Also Read : फीफा वर्ल्ड कप २०२६: कव्हरेजसाठी भारताकडून एकमेव महिला फोटो जर्नलिस्ट गीतिका तालुकदार यांची निवड
प्राथमिक माहितीनुसार, हमीरपुरमधील ‘मोरा कांडर’ आणि ‘कुरारा’ या भागांना जोडण्यासाठी बेतवा नदीवर नव्या पुलाचे बांधकाम सुरू होते. दरम्यान, गुरुवारी रात्री अचानक हवामान बदलले आणि जोरदार वादळाने परिसराला तडाखा दिला. (Hamirpur Bridge Collapse)
या वादळाच्या प्रचंड वेगामुळे पुलाचा जड स्लॅब अचानक कोसळला. त्या वेळी अनेक मजूर पुलावर काम करत असल्याने ते थेट मलब्याखाली दबले गेले. या दुर्घटनेनंतर पुलाच्या बांधकामातील सुरक्षाव्यवस्था, दर्जा आणि देखरेखीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Supreme Court, ECI आणि Citizenship चा पेच: नक्की काय सुरू आहे? | Analysis by Prakash Ambedkar






