Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

धर्मनिरपेक्ष संविधानामुळेच भारत टिकला – डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर

mosami kewat by mosami kewat
January 28, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
धर्मनिरपेक्ष संविधानामुळेच भारत टिकला – डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर
       

श्रामणेरी-बौद्धाचार्या प्रशिक्षण शिबिराचा समारोप उत्साहात

वाशी  : धर्माच्या आधारावर निर्माण झालेले देश दीर्घकाळ टिकू शकले नाहीत; मात्र धर्मनिरपेक्ष संविधानाच्या बळावर भारत आजही एकसंध आणि मजबूत आहे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी व राष्ट्रीय कार्याध्यक्ष तसेच समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी केले.

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) नवी मुंबई जिल्हा महिला शाखेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य महिला धम्म परिषद, श्रामणेरी-बौद्धाचार्या व उपासिका प्रशिक्षण शिबिराच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम बुद्ध प्रतिष्ठान विहार प्रांगण, सेक्टर १५, वाशी येथे पार पडला.

यावेळी त्यांनी सांगितले की, भारतीय स्वातंत्र्यदिन जसा महात्मा गांधींना समर्पित आहे, त्याचप्रमाणे प्रजासत्ताक दिन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित व्हावा, ही काळाची गरज आहे. पाकिस्तान, बांगलादेशसारखे धर्माधारित देश आज अस्थिरतेला सामोरे जात आहेत; परंतु भारत धर्मनिरपेक्ष संविधानामुळे टिकून आहे. 

मात्र संविधानविरोधी शक्ती सत्तेत असल्याने संविधान बदलण्याची भाषा केली जाते आणि हिंदू राष्ट्राची घोषणा केली जाते, याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. आज देशात संविधान समर्थक आणि संविधानविरोधक असे दोन प्रवाह निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दहा दिवसीय श्रामणेरी-बौद्धाचार्या प्रशिक्षण शिबिराच्या संघनायिका भिक्खुणी आर्या संघमित्रा होत्या.

कार्यक्रमात ॲड. एस. के. भंडारे (ट्रस्टी/राष्ट्रीय उपाध्यक्ष) यांनी मार्गदर्शन करताना भारतीय बौद्ध महासभेत महिलांना स्वतंत्र नेतृत्वाची संधी देण्यात आली असून राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर स्वतंत्र महिला कार्यकारिणी स्थापन करून खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानतेची अंमलबजावणी करण्यात आली असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात प्रथमच महिला जिल्हा शाखेने एकाचवेळी प्रशिक्षण शिबिर, धम्म परिषद व रॅलीचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी सर्व महिलांचे अभिनंदन केले.

धम्म परिषदेत तीन महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

सुप्रिया कासारे – बौद्ध धम्मामध्ये महिलांची प्रगती : काल, आज आणि उद्या

विशाखा निळे – संविधानामुळे महिलांना मिळालेले हक्क व अधिकार

उज्ज्वला खरात – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती का जाळली

या कार्यक्रमास सुषमा पवार, डॉ. अनंत हर्षवर्धन, बी. एच. गायकवाड गुरुजी, ॲड. डॉ. एस. एस. वानखडे, रागिणी पवार, भारती शिराळ, स्वाती शिंदे, चंदा कासले, विलास कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शिबिराच्या प्रमुख निवासी शिक्षिका म्हणून स्वाती गायकवाड यांनी जबाबदारी सांभाळली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शोभा कांबळे होत्या. सूत्रसंचालन ज्योती जाधव व संजय झनके यांनी केले.

शिबिरात १३ जिल्ह्यांतील ३३ महिला सहभागी झाल्या. परिषदपूर्वी डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या विशेष रथातून समता सैनिक दलाच्या बँड पथकासह भव्य रॅली काढण्यात आली. तसेच विविध शाखांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. मोठ्या संख्येने महिला-पुरुषांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


       
Tags: BuddhistConstitutionDr Babasaheb AmbedkarMaharashtraVanchit Bahujan AaghadiVashivbafotindia
Previous Post

अजित पवार यांचे विमान अपघातात निधन; राज्यात ३ दिवसांचा दुखवटा जाहीर!

Next Post

महापुरुषांचा अवमान सहन करणार नाही! गिरीश महाजनांविरोधात पुणे पोलिसांत तक्रार दाखल

Next Post
महापुरुषांचा अवमान सहन करणार नाही! गिरीश महाजनांविरोधात पुणे पोलिसांत तक्रार दाखल

महापुरुषांचा अवमान सहन करणार नाही! गिरीश महाजनांविरोधात पुणे पोलिसांत तक्रार दाखल

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
परीक्षा व्यवस्थे विरोधात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून तीव्र निषेध ; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
बातमी

परीक्षा व्यवस्थे विरोधात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून तीव्र निषेध ; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

by mosami kewat
June 19, 2026
0

पुणे : NEET पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, या प्रकरणासाठी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार धरत त्यांच्या...

Read moreDetails
16 चेंडूंत अर्धशतक, 34 चेंडूंत शतक; बिहारच्या अक्षरा गुप्ताचे वादळी त्रिशतक, 126 चेंडूंत 306 धावांची ऐतिहासिक खेळी

16 चेंडूंत अर्धशतक, 34 चेंडूंत शतक; बिहारच्या अक्षरा गुप्ताचे वादळी त्रिशतक, 126 चेंडूंत 306 धावांची ऐतिहासिक खेळी

June 19, 2026
चीन १३०० दशलक्ष बॅरल्स वि भारत २० दशलक्ष बॅरल्स!

चीन १३०० दशलक्ष बॅरल्स वि भारत २० दशलक्ष बॅरल्स!

June 19, 2026
वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली भटके-विमुक्त समाजाच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक

वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली भटके-विमुक्त समाजाच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक

June 19, 2026
नांदेड : लेबर कॉलनी येथे नवीन डीपीचे उद्घाटन; नागरिकांना कमी दाबाच्या वीजपुरवठ्याच्या समस्येतून दिलासा

नांदेड : लेबर कॉलनी येथे नवीन डीपीचे उद्घाटन; नागरिकांना कमी दाबाच्या वीजपुरवठ्याच्या समस्येतून दिलासा

June 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home