Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

महाराष्ट्र हादरला; विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू; प्रकाश आंबेडकरांकडून श्रद्धांजली

mosami kewat by mosami kewat
January 28, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
महाराष्ट्र हादरला; विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू; प्रकाश आंबेडकरांकडून श्रद्धांजली
       

बारामती  : राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत दुर्दैवी आणि सुन्न करणारी बातमी समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले आहे. या अपघातात अजित पवारांसह एकूण सहा जणांना आपले प्राण गमवावे लागले असून, डीजीसीएकडून (DGCA) या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार आज बारामतीमध्ये झंझावाती सभा घेणार होते. यासाठी ते आज सकाळी मुंबईहून खाजगी विमानाने बारामतीकडे रवाना झाले. बारामती विमानतळावर उतरत असतानाच विमानावरचे नियंत्रण सुटले आणि काही क्षणातच विमान जवळच्या शेतात कोसळून त्याला भीषण आग लागली. (Ajit Pawar passed away)

या अपघातात ६ जणांचे मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचे दोन वैयक्तिक सहाय्यक, वैमानिक आणि अन्य दोन व्यक्तीचे समावेश होते. यावेळी विमान पूर्णपणे जळून खाक झाले असून बचावकार्य तातडीने राबवण्यात आले. 

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी श्रद्धांजली वाहिली 

या धक्कादायक घटनेवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, “अजित पवार यांच्या अचानक झालेल्या निधनाने मला खूप धक्का बसला आहे. अजित पवारांची काम करण्याची एक स्वतःची वेगळी आणि शिस्तबद्ध शैली होती, हे नाकारता येणार नाही.” (Ajit Pawar passed away)

“त्यांच्या पत्नी, कुटुंब, मित्र आणि पक्षाच्या दुःखात मी सहभागी आहे” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

या भीषण विमान अपघातात अजित पवारांसह इतर ५ जणांनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रकाश आंबेडकर यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, “ज्या विमान अपघातात ६ जणांचा बळी गेला, त्या घटनेची अत्यंत योग्य आणि सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. (Ajit Pawar passed away)

प्रशासनावर पकड असलेला नेता म्हणून त्यांची ओळख होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाने महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.


       
Tags: Ajit Pawar passed awayBaramatiCongressMaharashtraPlane crashPoliticalpolticsPrakash AmbedkarVanchit Bahujan Aghadi
Previous Post

गिरीश महाजनांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा! परभणीत ‘वंचित’ आक्रमक, फोटोला मारले जोडे

Next Post

धक्कादायक: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन; अंजलीताई आंबेडकर यांनी वाहिली श्रद्धांजली 

Next Post
धक्कादायक: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन; अंजलीताई आंबेडकर यांनी वाहिली श्रद्धांजली 

धक्कादायक: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन; अंजलीताई आंबेडकर यांनी वाहिली श्रद्धांजली 

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
MPSC परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घ्यावी; वंचित बहुजन आघाडीचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
बातमी

MPSC परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घ्यावी; वंचित बहुजन आघाडीचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

by mosami kewat
July 10, 2026
0

बुलढाणा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा ऑनलाइनऐवजी पूर्वीप्रमाणे ऑफलाइन पद्धतीनेच घेण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने...

Read moreDetails
मोशी कचरा डेपो दुर्घटना : घनकचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र विभागाची गरज; दोषींवर कारवाई करा – ॲड. प्रकाश आंबेडकर

मोशी कचरा डेपो दुर्घटना : घनकचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र विभागाची गरज; दोषींवर कारवाई करा – ॲड. प्रकाश आंबेडकर

July 10, 2026
अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची सुपीक जमीन बांबू-चारा लागवडीसाठी देऊ नका; वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची सुपीक जमीन बांबू-चारा लागवडीसाठी देऊ नका; वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

July 10, 2026
अमेरिका-इराण तणावाचा भारताला फटका: सेन्सेक्स १६०० अंशांनी घसरला, खनिज तेल भडकले!

अमेरिका-इराण तणावाचा भारताला फटका: सेन्सेक्स १६०० अंशांनी घसरला, खनिज तेल भडकले!

July 9, 2026
जलकुंभातील गळती तातडीने थांबवा, दूषित पाणीपुरवठा बंद करा; वंचित बहुजन आघाडीची आयुक्तांकडे मागणी

जलकुंभातील गळती तातडीने थांबवा, दूषित पाणीपुरवठा बंद करा; वंचित बहुजन आघाडीची आयुक्तांकडे मागणी

July 9, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home