अकोला : देशभरात सातत्याने वाढत असलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अधिक कठीण बनले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडलेल्या दरांमुळे नागरिकांसह शेतकरी वर्गही मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जात आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अकोला शहरात वाढत्या महागाईविरोधात भव्य बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
Also Read : भारतीय अर्थव्यवस्था (२) : मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, कमकुवत कडी !
टॉवर चौक येथील वंचित बहुजन आघाडी पक्ष कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिक, शेतकरी, महिला तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन नागरिकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. वाढत्या इंधन दरांमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले असून सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली.
Also Read : Maharashtra Fuel Crisis : पेट्रोल-डिझेल टंचाईचे रुद्ररूप; डिझेलसाठी चक्क हाणामारी, शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा
मोर्चादरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध व्यक्त करत भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले. महागाईमुळे जनतेचे जगणे कठीण झाले असून सरकारने जनतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहावे, असे मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या बैलगाडी मोर्चामुळे शहरातील परिसर काही काळ घोषणांनी दणाणून गेला होता.
पवनचक्की प्रकल्पांविरोधात शेतकरी व ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण; चौकशी व नुकसानभरपाईची मागणी
नंदुरबार : तालुक्यातील कोळदा, भागसरी, खोंडामळी, विखरण, कलमाडी, कानडदा, सिंदगव्हाण, भालेर, नगाव, काकदें, जुनमोहीदे आणि हाटामोहीदे या गावांच्या परिसरात सुरू...
Read moreDetails






