Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

महाबोधी महाविहार आंदोलनाकडे राजकीय पक्षांचे दुर्लक्ष; मुंबईत बौद्ध समाजाचा संताप

mosami kewat by mosami kewat
June 28, 2025
in बातमी, राजकीय
0
महाबुद्ध विहार आंदोलनाकडे राजकीय पक्षांचे दुर्लक्ष; मुंबईत बौद्ध समाजाचा संताप

महाबुद्ध विहार आंदोलनाकडे राजकीय पक्षांचे दुर्लक्ष; मुंबईत बौद्ध समाजाचा संताप

0
SHARES
145
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

‎ ‎मुंबई : चेंबूर येथील फुलेनगरमध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाकडे प्रमुख राजकीय पक्षांनी केलेल्या दुर्लक्षामुळे आंबेडकरी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘बौद्धांनो वाचा आणि विचार करा, बौद्धांसोबत कोण आहे?’ या आशयाचे पोस्टर बुद्ध विहाराजवळ लावण्यात आले असून, या पोस्टरने लक्ष वेधून घेतले आहे. ‎

‎यावेळी स्थानिक नागरिक बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा काँग्रेस नेते राहुल गांधी या दोघांनीही ‘महाबोधी महाविहार’ आंदोलनावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी बोधगया येथील महाबोधी विहाराला भेट दिली होती, मात्र तिथे सुरू असलेल्या आंदोलनास्थळी ते आले नाहीत, तसेच त्यांनी याबाबत भाष्य केले नाही, यावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. ‎

‎या आंदोलनात बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू बाळासाहेब आंबेडकर आणि भारतीय बुद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव साहेब आंबेडकर यांचा सहभाग असल्याचे नागरिकांनी अधोरेखित केले. नेते बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतः आंदोलनात भाग घेतला असून, भीमराव आंबेडकरांनी दोनवेळा आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित राहून पाठिंबा दिला आहे. या आंदोलनात आंबेडकर कुटुंबाने आंदोलनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत साथ देण्याची ग्वाही दिली आहे. ‎ ‎

नागरिकांचा संताप आणि इशारा

राजकीय नेत्यांच्या या उदासीनतेवर बौद्ध नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. “जर तुम्ही आमच्या ‘महाबोधी बुद्ध विहारासाठी’ बोलू शकत नसाल, तर तुमचा चपलांचा हार घालून स्वागत करु, असे संतप्त उद्गार त्यांनी काढले. ‎ जे लोक आपल्या अस्मितेसाठी आणि नेत्यांसाठी आवाज उठवू शकत नाहीत, तसेच महाविहाराबद्दल बोलत नाहीत, अशा लोकांना समाजात स्थान नाही, त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. काँग्रेस आणि भाजपच्या “दलाल लोकांना” स्पष्ट इशारा दिला आहे की, यापुढे ते समाजात येत असतील तर त्यांना धडा शिकवल्याशिवाय समाज गप्प बसणार नाही.


       
Tags: Buddhist communityMahabodhi Viharmumbaipoliticsprotestvbaforindia
Previous Post

खासगी वीज परवान्यांविरोधात प्रकाश आंबेडकरांचा सरकारला इशारा: ‘वंचित’ रस्त्यावर उतरणार! ‎

Next Post

Dombivli : मारहाणीतून रिक्षाचालकाची आत्महत्या; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर गुन्हा दाखल

Next Post
मारहाणीतून रिक्षाचालकाची आत्महत्या; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर गुन्हा दाखल

Dombivli : मारहाणीतून रिक्षाचालकाची आत्महत्या; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर गुन्हा दाखल

Vikhroli bridge: विक्रोळीतील ६६ कोटींचा उड्डाणपूल ठरतोय डोकेदुखी; वंचित कडून उपाययोजना करण्याची मागणी ‎ ‎
बातमी

Vikhroli bridge: विक्रोळीतील ६६ कोटींचा उड्डाणपूल ठरतोय डोकेदुखी; वंचित कडून उपाययोजना करण्याची मागणी ‎ ‎

‎मुंबई: विक्रोळी येथील ६६ कोटी रुपये खर्चून सात वर्षांपूर्वी उभारलेला उड्डाणपूल आता वाहतूक कोंडीचे कारण ठरत आहे. यामुळे करत वंचित ...

June 28, 2025
वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक
बातमी

Jalna : लोणीकरांच्या फोटोला मारले जोडे!

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमकजालना : शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्याप्रकरणी आमदार बबनराव लोणीकर जोपर्यंत नम्रपणे माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना परतुर-मंठा ...

June 28, 2025
मारहाणीतून रिक्षाचालकाची आत्महत्या; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर गुन्हा दाखल
बातमी

Dombivli : मारहाणीतून रिक्षाचालकाची आत्महत्या; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर गुन्हा दाखल

डोंबिवली : डोंबिवली शहरातील मोठागाव येथे कार आणि रिक्षाच्या धडकेतून झालेल्या वादानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कार ...

June 28, 2025
महाबुद्ध विहार आंदोलनाकडे राजकीय पक्षांचे दुर्लक्ष; मुंबईत बौद्ध समाजाचा संताप
बातमी

महाबोधी महाविहार आंदोलनाकडे राजकीय पक्षांचे दुर्लक्ष; मुंबईत बौद्ध समाजाचा संताप

‎ ‎मुंबई : चेंबूर येथील फुलेनगरमध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाकडे प्रमुख राजकीय पक्षांनी केलेल्या दुर्लक्षामुळे आंबेडकरी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त ...

June 28, 2025
खासगी वीज परवान्यांविरोधात प्रकाश आंबेडकरांचा सरकारला इशारा: 'वंचित' रस्त्यावर उतरणार! ‎
बातमी

खासगी वीज परवान्यांविरोधात प्रकाश आंबेडकरांचा सरकारला इशारा: ‘वंचित’ रस्त्यावर उतरणार! ‎

मुंबई : राज्यात अदानी आणि टोरंट या कंपन्यांकडून अनेक शहरांमध्ये वीज वितरणासाठी परवान्यांचे अर्ज करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर, वंचित ...

June 28, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क