डोंबिवली : डोंबिवली शहरातील मोठागाव येथे कार आणि रिक्षाच्या धडकेतून झालेल्या वादानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कार चालकांनी शेळके यांना बेदम मारहाण करून रात्रभर घरात डांबून ठेवल्याचा आणि त्यांची रिक्षाही जप्त केल्याचा आरोप आहे. (Dombivli)
या घटनेनंतर विष्णुनगर पोलीस ठाण्यासमोर वंचित बहुजन आघाडीने तीव्र आंदोलन केल्यानंतर सात तासांनी गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, मोठागाव येथे एका कारची आणि रिक्षाची धडक झाली. या धडकेनंतर कार चालकांनी रिक्षा चालक मुंजाजी शेळके यांना मारहाण केली.
एवढेच नाही तर, त्यांना रात्रभर एका घरात डांबून ठेवल्याचा आणि त्यांची रिक्षाही जप्त केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणानंतर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मुंजाजी शेळके यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. शेळके यांच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Dombivli)
या घटनेला कारणीभूत असलेल्यांवर कारवाईची मागणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. वंचित बहुजन आघाडीने या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. विष्णुनगर पोलीस ठाण्यासमोर वंचित बहुजन महिला आघाडीच्या रेखा कुरवारे, डोंबिवली शहर अध्यक्ष गणेश गायकवाड, सम्यक विद्यार्थी आंदोलन ठाणे जिल्हा महासचिव राजू खरात यांच्यासह इतर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी तीव्र निदर्शने केली.
या आंदोलनानंतर पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत सात तासांनी संबंधित कार चालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास विष्णुनगर पोलीस करत आहेत.
‘ अमेरिकेत तीन भारतीय मारले गेले, मोदी गप्प का? ‘ प्रकाश आंबेडकरांचा सवाल
अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यात तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून चाळीसहून अधिक भारतीय थोडक्यात बचावल्याच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...
Read moreDetails






