पुणे – नुकतीच नागपूरात खरेदी-विक्री संघाची निवडणूक पार पडली. यामध्ये पारंपरिक मनुवादी विचारसरणीचे भाजप आणि काँग्रेस पुन्हा एकत्र आले होते. त्यांनी युती केली होती. हे काही पहिल्यांदाच घडलेलं नाही. तर भाजप आणि काॅग्रेस ही पारंपरिक युती आहे. या घटनेला आता एक आठवडा होत आला आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडक यांनी ट्विट करत राज्यातील पत्रकारांना, माध्यमांना व तथाकथित समाजसेवकांना प्रश्न विचारले आहेत.
ट्विट मध्ये अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, काँग्रेस आणि भाजपच्या ह्या युतीला एक आठवड्यापेक्षा जास्त वेळ झाला आहे. यावर पत्रकार, माध्यमं कधी व्हिडीओ बनवतील? कधी पत्र लिहून जाब विचारतील? कधी डिबेट घेतील? ‘समाजसेवक’ कधी बोलतील? जे उघडपणे दिसतंय त्यावर काहीही चर्चा होत नाहीये! आंबेडकरवाद्यांना हे बघायचे आहे की, ऐरवी छोट्या छोट्या गोष्टीवरून ओरडणारे यावेळी नामानिराळे झालेत! ते कधी यावर भूमिका घेतली! असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.