Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 3, 2025
in राजकीय
0
ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल !
       

– निवडणूक आयोगाला कोर्टाने पाठवली नोटीस

– सायंकाळी 6 नंतर मतदान कसे वाढले ?

मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी जाहीर करताना काही मतदारसंघात तफावत आढळली होती. त्यावर वंचित बहुजन आघाडीने निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते. त्यानंतर इतरही राजकीय पक्षांनी आवाज उठवला होता. पण वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दाखल केलेल्या याचिकेची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी याचिकेद्वारे केलेल्या मागणीनुसार उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्तांना नोटीस बजावली असून, दोन आठवड्यात खुलासा सादर करावा, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालावर ॲड. आंबेडकरांनी प्रश्न उपस्थित केले होते.

ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, “निवडणुकीचा निकाल देताना, पोल व्होटस् अन् काऊंटर व्होटस् यांची जुळवणी झाली पाहिजे. ती झाली नसेल, तर रिटर्निंग ऑफिसरने तो दस्ताऐवज निवडणूक आयोगाकडे पाठवले पाहिजे आणि निवडणूक आयोगाने त्यावर जे निर्देश देतील, त्यानुसार निकाल पाहिजे”. निवडणूक आयोगाने आदर्श नियमावली पाळली नाही, असाही आक्षेप ॲड. आंबेडकर यांनी घेतला आहे.

विधानसभा निवडणुकीत सायंकाळी सहा वाजल्यानंतर 76 लाख मतदान कसं वाढलं, यावर याचिकेद्वारे आक्षेप घेण्यात आला आहे. मतदानाचे व्हिडिओ देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान, ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार युक्तिवाद केला. उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.

वंचित बहुजन आघाडीने सुरुवातीपासून हा मुद्दा लावून धरला असून, केवळ प्रश्न उपस्थित करून आम्ही हा मुद्दा सोडून दिलेला नाही. तर आमचा पाठपुरावा सुरू आहे. न्यायालयीन पातळीवर आम्ही निवडणूक आयोगाला याबाबत खुलासा करण्याची विनंती केली आहे, असे याचिका दाखल केली होती तेंव्हा आंबेडकर यांनी याआधी सांगितले होते. त्याच प्रकरणात आता हायकोर्टाने दखल घेऊन निवडणूक आयोगाला नोटीस बजावल्याने वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याचे हे मोठे यश मानले जात आहे.


       
Tags: Election commissionEVMMaharashtraPrabuddh BharatPrakash AmbedkarVanchit Bahujan AaghadiVidhansabha Election
Previous Post

अमृतसर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबना प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन !

Next Post

२ एकर जागेत उभारणार, संविधान भवन !

Next Post
२ एकर जागेत उभारणार, संविधान भवन !

२ एकर जागेत उभारणार, संविधान भवन !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
जयभीम नगरातील पाण्याच्या पाईपलाईनचा प्रश्न मार्गी; वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांना यश
बातमी

जयभीम नगरातील पाण्याच्या पाईपलाईनचा प्रश्न मार्गी; वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांना यश

by mosami kewat
August 24, 2026
0

नांदेड : जयभीम नगर येथे मागील अनेक दिवसांपासून पाईपलाईन खराब झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. नागरिकांच्या समस्येची...

Read moreDetails
पुरोगामी राजकारणाच्या नावाखाली आंबेडकरी चळवळीकडे दुर्लक्ष, पण उच्चवर्णीय नेत्याने आंबेडकरी चळवळीचेचं मुद्दे मांडले की कौतुक – प्रा. अंजलीताई आंबेडकर

पुरोगामी राजकारणाच्या नावाखाली आंबेडकरी चळवळीकडे दुर्लक्ष, पण उच्चवर्णीय नेत्याने आंबेडकरी चळवळीचेचं मुद्दे मांडले की कौतुक – प्रा. अंजलीताई आंबेडकर

August 24, 2026
पुणे-सातारा महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्तारोको; हाय-व्होल्टेज सबस्टेशन व टॉवर लाईन प्रकल्प रद्द करण्याची मागणी

पुणे-सातारा महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्तारोको; हाय-व्होल्टेज सबस्टेशन व टॉवर लाईन प्रकल्प रद्द करण्याची मागणी

August 24, 2026
देशातील घोटाळे अनुसूचित जातींच्या आर्थिक तरतुदीपेक्षा अधिक!

देशातील घोटाळे अनुसूचित जातींच्या आर्थिक तरतुदीपेक्षा अधिक!

August 24, 2026
Amravati Hospital Fire : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील तीन नवजात बालकांच्या मृत्यूला राज्याचे भ्रष्ट आरोग्य खाते जबाबदार - राजेंद्र पातोडे

Amravati Hospital Fire : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील तीन नवजात बालकांच्या मृत्यूला राज्याचे भ्रष्ट आरोग्य खाते जबाबदार – राजेंद्र पातोडे

August 24, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home