Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

आम्हाला सत्ता द्या, आम्ही हमीभावाचा कायदा करतो – ॲड. प्रकाश आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 19, 2024
in राजकीय
0
आम्हाला सत्ता द्या, आम्ही हमीभावाचा कायदा करतो – ॲड. प्रकाश आंबेडकर
       

खोटारडे आणि फसवे राजकारणी ओळखा

वर्धा : आमच्या हातात सत्ता द्या, आम्ही शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याचा कायदा केल्याशिवाय राहणार नाही, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी वर्धा येथील वंचित बहुजन आघाडीने आयोजित केलेल्या महाएल्गार सभेत केले आहे.

हमीभावाचा कायदा करायला पाहिजे असे आमचे म्हणणे आहे, जेणेकरून या कायद्याचं उल्लंघन केले, तर त्या व्यापाऱ्यांवर कारवाई करता येईल असेही त्यांनी सांगितले.

जे खोटारडे आणि फसवे आहेत. त्यांच्या हातात पुन्हा पाच वर्षे सत्ता देता कामा नये, हे लक्षात घ्यायला पाहिजे. दिल्लीत शेतकरी आंदोलनाला बसला आहे. आज मजुरांची चर्चाच होताना दिसत नाही. शेतकरी इर्शेला पेटला आहे. कारण, हे लालांच सरकार आहे, या मुद्द्यांकडे लक्ष वेधत सध्याचे सरकार सामान्य माणसाचे नसल्याची टीकाही आंबेडकर यांनी केली.

सभेला लाखो नागरिकांची गर्दी

वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेसाठी वर्धा जिल्ह्याच्या विविध भागातून नागरिक मोठ्या संख्येने आले होते. सभेपूर्वी मैदान भरगच्च भरले होते. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, महागाई, शेतमालाला हमीभाव अशा विविध मुद्यांवर आंबेडकर यांनी मुद्देसूद मांडणी केली. त्याचप्रमाणे इडी, सीबीआयची भीती घालून भाजप आणि आरएसएसचे सरकार विरोधी पक्षांना घाबरवण्याचे काम करीत आहे. पक्ष फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. निवडणूक जशी जवळ येईल तसे हे प्रकार वाढतील, असेही आंबेडकर म्हणाले.


       
Tags: Mahaellagar sabhaMaharashtramaharashtrgovernmentPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadiwardha
Previous Post

वर्ध्यातील महासभेसाठी मैदान हाऊसफुल्ल

Next Post

सरकारची दडपशाही निवडणुकांपर्यंत आणखी वाढणार

Next Post
सरकारची दडपशाही निवडणुकांपर्यंत आणखी वाढणार

सरकारची दडपशाही निवडणुकांपर्यंत आणखी वाढणार

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
परभणीतील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील अनियमिततांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा!
बातमी

परभणीतील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील अनियमिततांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा!

by mosami kewat
April 16, 2026
0

परभणी : वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन देत वसंतराव नाईक महाराष्ट्र कृषी विद्यापीठ, परभणी येथे सुरू...

Read moreDetails
आगीचे तांडव! लखनौत काही क्षणांत २०० कुटुंबांचे संसार उघड्यावर; मोठी जीवितहानी टळली

आगीचे तांडव! लखनौत काही क्षणांत २०० कुटुंबांचे संसार उघड्यावर; मोठी जीवितहानी टळली

April 16, 2026
चाळीसगावात भीम जयंती मिरवणुकीवर दगडफेक; भाजप आमदार मंगेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

चाळीसगावात भीम जयंती मिरवणुकीवर दगडफेक; भाजप आमदार मंगेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

April 16, 2026
दापोलीत सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा करिअर गाईडन्स सेमिनार उत्साहात संपन्न

दापोलीत सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा करिअर गाईडन्स सेमिनार उत्साहात संपन्न

April 16, 2026
भडकळ गेट येथे वंचित बहुजन आघाडीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन; सामाजिक समतेचा संकल्प

भडकळ गेट येथे वंचित बहुजन आघाडीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन; सामाजिक समतेचा संकल्प

April 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home