नागपूर : वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस पार्टी, आम आदमी पार्टी, कम्युनिस्ट पार्टी आणि इतर समविचारी पक्षांच्या वतीने नागपूर येथे आरएसएसच्या मुख्यालयावर “विशाल जन आक्रोश संयुक्त मोर्चा” काढण्यात आला. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव एपस्टीन फाईलमध्ये आले असून, अमेरिकेसोबत केलेल्या देशविरोधी व्यापार करारांमुळे देशाची सार्वभौमता अमेरिकेसमोर गहाण ठेवण्यात आली आहे. (Mass Protest March at RSS Headquarters)
अमेरिकेसोबत करण्यात आलेल्या करारांचा परिणाम शेतकरी, भारतीय उत्पादने, मजूर वर्ग आणि देशाच्या सार्वभौमत्वावर होत असल्याचे सांगत, ही लढाई तालुका आणि जिल्हा स्तरावर नेऊन जनजागृती करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
तसेच, आरएसएसनेच नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी बसवले असून, ते ब्लॅकमेल होऊन देशविरोधी निर्णय घेत आहेत, असा आरोप करत “स्वतःला देशभक्त म्हणवणारा आरएसएस यावर मौन का बाळगतो?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मोदी यांना पंतप्रधानपदी कायम का ठेवले आहे, याचे स्पष्टीकरण आरएसएसने द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. (Mass Protest March at RSS Headquarters)
दरम्यान, मोर्चेकऱ्यांनी आरएसएस मुख्यालयाकडे शांततेत जाण्याचा प्रयत्न केला असता, पोलिस प्रशासनाने मोर्चा मधेच अडवला.
या मोर्चात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस आणि इतर पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






