10 दिवसीय श्रामनेर व बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिराचा समारोप
परभणी : भारतीय बौद्ध महासभा, परभणी जिल्हा दक्षिण तसेच पूर्णा तालुका व शहर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्णा शहरात दिनांक १ मार्च ते १० मार्च दरम्यान दहा दिवसीय श्रामनेर व बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक १० मार्च रोजी या शिबिराचा समारोप कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला पूज्य भन्ते पी. धम्मानंदजी (भारतीय बौद्ध महासभा भिक्खू संघ, चैत्यभूमी स्मारक सदस्य) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच केंद्रीय शिक्षक व प्रशिक्षक आदरणीय दशरथ गायकवाड सर कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड होते.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य पर्यटन व प्रचार सचिव बाबासाहेब धबाले, परभणी जिल्हा दक्षिणचे जिल्हाध्यक्ष व केंद्रीय शिक्षक तुकाराम ढगे सर, परभणी जिल्हा उत्तरचे जिल्हाध्यक्ष एम. एम. भरणे, दक्षिण जिल्ह्याचे सरचिटणीस गौतमराव दिपके, जिल्हा संस्कार उपाध्यक्ष यशवंतराव लामसोंगे, जिल्हा संघटक ॲड. सिद्धार्थ खरे, पंजाबराव मनोहर, तालुका कोषाध्यक्ष राहुल कचरे, शहर शाखेचे अध्यक्ष बौद्धाचार्य उमेश बाऱ्हाटे, तालुका संरक्षण केशव मकासरे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
याशिवाय धारबा धुमाळे, राजू गायकवाड, राहुल शिवभक्त, गोविंदराव गायकवाड, दिलीप हनवते, भगवान जोंधळे, मनोज मुळे, अशोक खरे, क्रांतिकार ढगे, प्रेमानंद ढगे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सल्लागार सुनील मगरे, प्राचार्य केशव जोंधळे सर, माजी नगरसेवक नटराज कांबळे, अनिल इंगोले, सुदाम गायकवाड, कणकटे मामा, आनंद गायकवाड, राहुल गायकवाड, मधुकर खंदारे, आश्रोबा श्रीखंडे, मगरे मामा तसेच मोठ्या संख्येने बुद्ध उपासक-उपासिका व बालक-बालिका उपस्थित होते.

यावेळी पूज्य भंते पी. धम्मानंदजी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी भारतीय बौद्ध महासभेच्या विचारधारेशी प्रामाणिकपणे कार्य केले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला समतामूलक समाज निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.
कार्यक्रमात अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड, तसेच प्रमुख पाहुणे एम. एम. भरणे, तुकाराम ढगे, बाबासाहेब धबाले आणि प्राचार्य केशवराव जोंधळे सर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष बौद्धाचार्य उमेश बाऱ्हाटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राहुल कचरे यांनी मानले. शेवटी सरनत्य गात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या प्रशिक्षण शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा दक्षिण, तालुका व शहर शाखेचे सर्व पदाधिकारी तसेच समता सैनिक दलाच्या सैनिकांनी मोठ्या परिश्रमाने योगदान दिले.






